शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चक्काजाम आंदोलनामुळे एक तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:16 IST

परभणी : दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात शनिवारी पोखर्णी फाटा येथे एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात ...

परभणी : दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात शनिवारी पोखर्णी फाटा येथे एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिले. एक तासाच्या या आंदोलनामुळे गंगाखेड रोडवर दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

शेतकरी विरोधी असलेले तीन कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी ७२ दिवसांपासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करीत आहेत. मात्र हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केंद्र शासन करीत असल्याने येथील शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने तीव्र संताप व्यक्त करीत केंद्राच्या या धोरणाविरुद्ध शनिवारी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली. शनिवारी सकाळी ११ वाजेपासूनच पोखर्णी फाटा येथे शेतकऱ्यांची गर्दी झाली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष आंदोलनाला प्रारंभ झाला. रस्त्याच्या मधोमध शेतकरी ठाण मांडून बसल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावेत, अशी मागणी करीत यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. जवळपास एक तास केलेल्या या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आजच्या देशव्यापी आंदोलनानंतरही कृषी कायदे परत घेतले नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कॉ. विलास बाबर म्हणाले, मागील ७२ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन शासनाने हे कायदे परत घेतले पाहिजेत. मात्र तसे न करता उलट आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलनाच्या मार्गावर खिळे ठोकणे, खंदक खांदणे हा प्रकार निंदनीय आहे. केंद्र शासनाच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात आले. कॉ. विलास बाबर यांच्यासह माणिक आव्हाड, पिंटू वाघ,नागेश शिंदे, रूसतुम संसारे, गोविंद भोसले, जगन्नाथ पवार, कमलाकर बाबर, वसंत पवार, भास्कर गवळी, गोविंद भांड, अशोक साखरे, विष्णू मोगले, पंडितराव गोरे, उद्धव ढगे, विलास दळवे, पांडुरंग पारधे, राम गबाळे, गणेशराव वाघ, नारायण वाघ, नरहरी वाघ, दिगांबर गमे, दामोदर काळे, विष्णू ढगे, लक्ष्मण ढोबरे, कमलेश ठेंगे, रवी बाबर, परमेश्वर कदम, मदन शिंदे, नागनाथ पवार, विठ्ठल वाघ यांच्यासह बहुसंख्य शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.