शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

समाज माध्यमाचा गैरवापर भोवला ; ५७ जणांना नोटीसा: पोलीस अधीक्षकांकडून संबंधितांना तंबी

By राजन मगरुळकर | Updated: March 23, 2025 16:00 IST

२१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर ५७ जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.

राजन मंगरुळकर, परभणी : विविध धार्मिक, राजकीय मुद्द्यांवरून समाज माध्यमावर केलेल्या वादग्रस्त पोस्ट, कमेंट करणाऱ्या संबंधितांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून पोलीस अधीक्षकांनी तंबी दिली. त्याशिवाय समाज माध्यमाचा गैरवापर करणाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले. यात २१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर ५७ जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.

पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यात सायबर पोलीस ठाण्यासह सर्व पोलीस ठाण्यामध्ये सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलची स्थापना केली आहे. त्यानुसार सर्व अंमलदार आणि पोलीस ठाणे स्तरावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी विविध टूल्स आणि हँशटँगचा वापर केला जात आहे. यात धार्मिक व राजकीय मुद्द्यावरून वादग्रस्त पोस्टवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. प्रोफाइलची माहिती मिळवून संबंधित पोस्ट डिलीट करण्यासाठी प्रक्रिया पोलीसच पार पाडत आहेत. अशा गंभीर प्रकरणात वादग्रस्त पोस्ट, कमेंट करणाऱ्यावर चार गुन्हे दाखल झाले आहेत. २१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर ५७ जणांना नोटीस देण्यात आल्या आहेत. यामध्ये बीएनएस २९९ अंतर्गत कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा दूष्ट उद्देशाने अपमान केल्याचे आढळल्यास तीन वर्षापर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. बीएनएस ३५२ अंतर्गत कोणत्याही व्यक्तीचा जाणीवपूर्वक अपमान करून चिथावणी देणे, ज्यातून सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असेल अशा प्रकरणात दोन वर्षापर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो.

या क्रमांकावर साधा संपर्क...

समाज माध्यमावर कुठलेही पेज, वैयक्तिक खात्यावर वादग्रस्त आक्षेपार्ह पोस्ट, कमेंट आढळून आल्यास ७७४५८५२२२२ या पोलीस नियंत्रण कक्षाच्या व्हाट्सअपवर लिंक, स्क्रीनशॉट पाठवावे. इतरत्र कुठेही सदर पोस्ट शेअर करू नये, ती लाईक करू नये अथवा त्यावर कसलीही कमेंट करू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी नागरिकांना केले आहे.

टॅग्स :Parbhani policeपरभणी पोलीस