शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : परतीच्या पावसाने सात गावांचा तुटला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 23:40 IST

तालुक्यात २१ आॅक्टोबर रोजी सकाळी व रात्री झालेल्या पावसामुळे शेळगाव-उक्कडगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने सात गावांचा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना गैरसोयीला सामोेरे जावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्केसोनपेठ (परभणी): तालुक्यात २१ आॅक्टोबर रोजी सकाळी व रात्री झालेल्या पावसामुळे शेळगाव-उक्कडगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने सात गावांचा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना गैरसोयीला सामोेरे जावे लागले.एकीकडे केंद्र व राज्य शासन ग्रामस्थांना दळण-वळणाच्या सेवा व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा खर्च करीत आहे. ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक चांगले रस्ते तयार करण्यात आले आहेत.दुसरीकडे मात्र शेळगाव येथून वाहणाऱ्या फाल्गुनी नदीला २१ आॅक्टोबर रोजी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे हे पाणी शेळगाव, उक्कडगाव रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलावरून वाहत होते. त्यामुळे सोमवारी दिवसभर उक्कडगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लासीना इ. गावांतील ग्रामस्थांना सोनपेठ शहर गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.विशेष म्हणजे जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना पायी व वाहनातून मार्ग काढावा लागला. शेळगाव, उक्कडगाव रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलाचा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून ऐरणीवर आहे. थोडासा पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी वाहते. परिणामी तालुक्यातील उक्कडगाव, गंगापिंपरी, गोळेगाव, लासीना इ. गावांचा वारंवार संपर्क तुटतो. हा पूल नव्याने उभारावा, यासाठी तालुका व जिल्हा प्रशासनाकडे अनेक वर्षापासून मागणी केली जात आहे; परंतु, या मागणीचा विचार होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.ेसात : गावांचा निवडणुकीवर बहिष्कार४सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील सात गावांनी रस्त्याच्या प्रश्नासाठी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला. त्यातच सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेळगाव-उक्कडगाव रस्त्यावरील अरूंद पुलावरून पाणी आल्याने सात गावांचा सोनपेठ शहराशी संपर्क तुटला.४विशेष म्हणजे या सर्व गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा तालुका, जिल्हा प्रशासनाकडे रस्त्याच्या प्रश्नासाठी साकडे घातले; परंतु, जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखविली. त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील सात गावांतील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केलेच नाही.ग्रामस्थांत तीव्र संताप४सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लासीना इ. सात गावांतील ग्रामस्थांना पावसाळ्यातील चार महिने शेळगाव-उक्कडगाव रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलामुळे गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस