शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

परभणी : आॅक्टोबरमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:25 AM

जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कृषी हंगाम पुरता हातचा निघून गेला असून या संकटाच्या काळातच जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. या महिन्यात सर्वाधिक १४ शेतकरी आत्महत्या झाल्या असून, त्यापैकी ७ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात प्रशासनाने कुटुंबियांना आर्थिक मदत देऊ केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कृषी हंगाम पुरता हातचा निघून गेला असून या संकटाच्या काळातच जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. या महिन्यात सर्वाधिक १४ शेतकरी आत्महत्या झाल्या असून, त्यापैकी ७ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात प्रशासनाने कुटुंबियांना आर्थिक मदत देऊ केली आहे.मागील काही वर्षापासून शेतकरी आत्महत्येचे संकट जिल्ह्यासह राज्यभरात चिंतेचा विषय ठरत आहे. पूर्णत: निसर्गावर अवलंबून असलेली शेती दरवर्षी तोट्यात जात आहे.कधी पावसाचा लहरीपणा तर कधी अति पाऊस यामुळे शेती पिके हातची जावून आर्थिक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. एकाही वर्षात समाधानकारक सुगी होत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत असून त्यातूनच शेतकरी आत्महत्येसारखे प्रकार होत आहेत.यावर्षी जानेवारी महिन्यापासून २२ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात ७५ शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. प्रत्येक महिन्यामध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत आहेत. यात आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक १४ शेतकºयांनी आत्महत्येचा कटू मार्ग पत्कारला. या महिन्यामध्ये सातत्याने पाऊस झाला. सोयाबीन, कापूस या दोन्ही नगदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. कर्ज काढून पिकविलेली शेती निसर्गाच्या संकटापुढे भुईसपाट झाल्याने हे दु:ख शेतकºयांना सहन झाले नाही. त्यातूनच शेतकरी आत्महत्या घटल्या आहेत. या महिन्यात १४ शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली. जिल्हा प्रशासनाने या शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांचा तपास करुन त्यातील ७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत देऊ केली आहे. या घटनांपैकी ५ प्रकरणे अपात्र ठरविले असून दोन प्रकरणे अजूनही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरम्यान, मे आणि जून या दोन महिन्यात प्रत्येकी ९, आॅगस्ट महिन्यात १०, फेब्रुवारी आणि जुलै महिन्यात प्रत्येकी ५, जानेवारी आणि सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी ४ आणि एप्रिल महिन्यामध्ये ८ शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. १ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या काळात शेतकरी आत्महत्येच्या तीन घटना घडल्या असून त्यापैकी चौकशी केलेले एक प्रकरण अपात्र ठरविण्यात आले. तर दोन प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे.११ महिन्यांच्या या काळात जिल्ह्यात एकूण ७५ शेतकरी आत्महत्येची प्रकरणे झाली आहेत. प्रशासनाने या प्रकरणांची चौकशी केली. तेव्हा ४५ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली असून २६ प्रकरणे प्रशासकीय मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत.चार प्रकरणांची चौकशी अद्यापही प्रलंबित आहे. पात्र ठरविलेल्या शेतकरी आत्महत्येच्या ४५ प्रकरणात शेतकºयांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाख रुपये या प्रमाणे ४५ लाख रुपयांची मदत प्रशासनाने दिली आहे.मागील वर्षी झाल्या १२९ शेतकरी आत्महत्या४मागील वर्षीही जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या पावसाळी हंगामात परतीचा पाऊस झाला नसल्याने संपूर्ण रबी हंगामावर पाणी फेरावे लागले होते. सर्वसाधारण आॅक्टोबर महिन्यात रब्बी हंगामाला प्रारंभ होतो; परंतु, याच महिन्यात पाऊस झाला नसल्याने मागील वर्षी देखील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आॅक्टोबर महिन्यातच घडल्या होत्या. या महिन्यात १७ शेतकºयांनी नापिकी आणि कर्जाच्या बोजाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली होती. २०१८ मध्ये फेब्रुवारी, जून आणि एप्रिल महिन्यामध्ये १३ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या होत्या. आॅगस्ट आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात प्रत्येकी १२ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. मार्च महिन्यात १०, सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये प्रत्येकी ९, जानेवारी महिन्यात ६ तर जुलै महिन्यामध्ये ७ आणि मे महिन्यात ८ शेतकºयांनी नापिकीला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलले होते.२०१८ मध्ये ८६ प्रकरणे झाली होती पात्र४मागील वर्षीच्या दुष्काळात १२९ शेतकºयांनी आत्महत्येचा मार्ग पत्कारला. जिल्हा प्रशासनाने केलेल्या चौकशीमध्ये ८६ शेतकरी आत्महत्येचे प्रकरणे पात्र ठरविली होती. तर ४३ प्रकरणे अपात्र ठरविली होती. या संपूर्ण वर्षभरात ८६ शेतकºयांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाख रुपये या प्रमाणे ८६ लाखांची आर्थिक मदत प्रशासनाने दिली होती.४यावर्षी देखील शेतकºयांवर अतिवृष्टीचे संकट ओढवले आहे. या शेतकºयांना धीर देण्यासाठी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. प्रशासनाने नुकसान भरपाईची मदत त्वरित वाटप करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळfarmer suicideशेतकरी आत्महत्या