शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाईवर वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा...
4
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
5
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
6
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
7
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
8
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
9
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
10
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
11
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
12
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
13
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
14
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
15
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
16
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
17
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
18
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
19
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
20
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 16:49 IST

पाकिस्तानच्या चामड्याच्या कारखान्यांमधून येणाऱ्या विषारी पाण्यामुळे पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यातील नद्या दूषित झाल्या आहेत.

भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या फाजिल्का जिल्ह्यातील अरनीवाला-कटैहड़ा परिसरात सध्या एक गंभीर संकट उभे राहिले आहे. पाकिस्तानमधील कसूर जिल्ह्यातील चामड्याच्या कारखान्यांमधून सोडण्यात येणारे रासायनिक आणि प्रदूषित पाणी सरळ सतलुज नदीद्वारे भारतीय सीमावर्ती भागांत येत असल्याने नद्यांचे पाणी काळवंडले आहे. या विषारी पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.

आरोग्याचा प्रश्न गंभीर

नाले आणि नद्यांमधील पाणी इतके विषारी झाले आहे की, स्थानिक प्रशासनाला वॉटर वर्क्सची पाणीपुरवठा सेवाही बंद करावी लागली आहे. भूजल आधीच पिण्यायोग्य नसल्याने आणि आता नद्यांचे पाणीही प्रदूषित झाल्याने ग्रामस्थ दुहेरी संकटात सापडले आहेत. पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याने अनेक लोक आजारांच्या विळख्यात अडकले आहेत. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका माजी आरोग्यमंत्री आणि भाजप नेते सुरजीत कुमार ज्याणी यांच्या कटैहड़ा या गावालाही बसला आहे.

वॉटर वर्क्सची दुरवस्था

स्थानिक पंचायत आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सध्या पंचायत आपल्या स्तरावर नवीन बोअरवेल खोदून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र हे पाणीही पिण्यायोग्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर, पाणीपुरवठा केंद्रांची दुरवस्था इतकी बिकट आहे की, तिथे पशुंचा वावर वाढला असून टाक्यांमध्येही प्रचंड घाण साचली आहे. यामुळे ग्रामस्थांना नाईलाजाने विकतचे पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे.

'सरकारने आता तरी शुद्ध पाण्याचे आरओ प्लांट बसवावेत'

ग्रामस्थांनी आणि सरपंच जगतपाल भाखर यांनी सरकारकडे आता आरओ प्लांट उभारण्याची आग्रही मागणी केली आहे. "आम्ही अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा केला, पण आश्वासनांशिवाय काहीही मिळाले नाही. निवडणुकीत शुद्ध पाणी देण्याचे दिलेले आश्वासन आता तरी पूर्ण करा," अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून उमटत आहे.

पंजाब सरकार काय म्हणते?

या विषयावर पंजाबचे वित्तमंत्री हरपाल चीमा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, "ही समस्या जुनी आणि मोठी आहे. केंद्र सरकारकडे आम्ही वारंवार मागणी केली आहे की, सीमेवर धरण बांधावे किंवा पाकिस्तानच्या दूषित पाण्याला रोखण्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. दुर्दैवाने केंद्राकडून पंजाबला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. मात्र, आता पंजाब सरकार स्वतःच्या स्तरावर यावर तोडगा काढण्यासाठी कामाला सुरुवात करणार आहे, जेणेकरून सीमावर्ती गावांतील नागरिकांना या विषारी पाण्यापासून मुक्ती मिळेल."

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's Toxic Game: Polluted Rivers Plague Punjab, Fueling Disease

Web Summary : Pakistani factory waste poisons Punjab's rivers, causing severe health issues. Residents lack clean water, forcing reliance on expensive alternatives. The government promises action but faces challenges.
टॅग्स :PunjabपंजाबPakistanपाकिस्तान