शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चार कोटींच्या निधीवर पुढाऱ्यांचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:15 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक आहे. मागील काही वर्षात केंद्र सरकारने वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना निधी देताना ...

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक आहे. मागील काही वर्षात केंद्र सरकारने वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना निधी देताना महत्त्व दिले आहे. निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात वितरीत करण्यात येत असल्याने गावपातळीवर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कोविडमुळे मागील ७-८ महिन्यांपासून निवडणुका रखडल्या होत्या. याकाळात ग्रामपंचायतीवर प्रशासकही नेमण्यात आले होते. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारकडून १५व्या वित्त आयोगअंतर्गत ग्रामपंचायतीच्या खात्यात थेट निधी वर्ग करण्यात आला आहे. यावेळेस १५व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करताना अनेक नवीन नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. तसेच धनादेशाने व्यवहार करण्यात आल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी लागला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झालेला निधी अद्याप खर्च करण्यात आला नाही. तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी होत आहेत. त्यातील ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ३८ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. गावागावात पार्ट्याना ऊत आला आहे. दारूचे बॉक्स रिचविले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यातील बाभळगाव, हदगाव, कासापुरी, कानसूर, उमरा, लिंबा, गुंज खु या प्रमुख गावातील निवडणुकीत तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या पुढाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यातच ग्रामपंचायतींच्या खात्यावर असलेल्या ३ कोटी ९४ लाख १४ हजार रुपयांच्या निधीवरही या पुढाऱ्यांचा डोळा आहे.

दोन टप्प्यात आलेला निधी

१५व्या वित्त आयोगाच्या निधीतून तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींना दोन टप्प्यात ३ कोटी ९४ लाख १४ हजार रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. अद्याप एकाही ग्रामपंचायतीचा निधी खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे नवीन निवडून येणाऱ्या मंडळींना ग्रामपंचायत स्तरावर सत्ता मिळवल्यानंतर विकासकामासाठी तातडीने निधी खर्च करता येणार आहे.