शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

तण नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST

परभणी : सद्य:स्थितीत तणामुळे उद्‌भवणारे पीक नुकसान व तण नाशकांच्या अति वापराने होणारे दुष्परिणाम, सेंद्रिय शेतीमध्ये तण व्यवस्थापन, तणनाशकांना ...

परभणी : सद्य:स्थितीत तणामुळे उद्‌भवणारे पीक नुकसान व तण नाशकांच्या अति वापराने होणारे दुष्परिणाम, सेंद्रिय शेतीमध्ये तण व्यवस्थापन, तणनाशकांना प्रतिकार करणारी तणे आदी बाबींचा विचार केल्यास एकात्मिक तण व्यवस्थापन हाच योग्य पर्याय आहे, असे प्रतिपादन डॉ. सुशीलकुमार यांनी केेले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विद्या विभागाद्वारे व राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) यांच्या सहकार्याने मागासवर्गीय कृषी पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विषयज्ञान विकासासाठी ‘एकात्मिक तण व्यवस्थापन तथा तणनाशकाचा कार्यक्षम वापर’ या विषयावर तीन दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी जबलपूर येथील भारतीय तण विज्ञान संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुशीलकुमार यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी परभणी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयोजक कृषीविद्या विभागाचे प्रमुख डॉ. बी.व्ही. आसेवार, नाहेप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. सय्यद इस्माईल यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, तणनाशकांच्या अयोग्य वापरामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांवर विपरीत परिणाम होऊन जमिनीचे जैविक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे तणनाशकांचा योग्य प्रमाणात वापर आवश्यक असल्याचे ते म्हणाले. डॉ. बी.व्ही. आसेवार यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. डॉ. सुनीता पवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आय.ए.बी. मिर्झा यांनी आभार मानले. या प्रशिक्षणात कोईम्बतूर येथील तामिळनाडू कृषी विद्यापीठातील कृषी विद्या विभागाचे प्रमुख डॉ. चिन्ना मुथ्थू, डॉ. मुरली अर्थनारी, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. सुनीता, अकोला कृषी विद्यापीठातील तणव्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जे.पी. देशमुख, संशोधन उपसंचालक डॉ. ए.एस. जाधव, डॉ. सुधीर आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डाॅ. विशाल अवसरमल, डॉ. मेघा जगताप, रविकुमार कल्लोजी, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. शिवराज शिंदे, रामदास शिंपले आदींनी सहकार्य केले.