शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी माणसाला मोबाइल देऊ नका, क्षणात बँक खाते होऊ शकते साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:22 IST

आजचा मोबाइल म्हणजे आपले बँक खाते आहे. पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी जशी बँकेची माहिती घेऊन खाते काढले जाते, तसेच मोबाइलमधील ...

आजचा मोबाइल म्हणजे आपले बँक खाते आहे. पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी जशी बँकेची माहिती घेऊन खाते काढले जाते, तसेच मोबाइलमधील माहितीसुद्धा सांभाळून ठेवणे गरजेचे आहे; अन्यथा फसवणूक करणाऱ्यांच्या हातातून आपल्या मोबाइलमधील बँक खाते साफ केले जाऊ शकते. आधार आणि कोणत्याही व्यवहाराला पूर्ण करण्यासाठी दरवेळी मोबाइलवर एक ओटीपी येतो. हा ओटीपी चुकीच्या माणसाच्या हातात एका काॅलसाठी तुम्ही दिल्यास तुमची फसवणूक होऊ शकते.

ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाऊ शकते फसवणूक-

कॉल करण्यासाठी मोबाइल घेऊन

वेगळी लिंक पाठवून

लॉटरी लागली आहे असे सांगून

केवायसीसाठी आवश्यक आहे, असे सांगून

ज्येष्ठ नागरिकांची होऊ शकते फसवणूक

अनेक ज्येष्ठ नागरिकांकडे अँड्रॉइड मोबाइल उपलब्ध असतात. मात्र, त्यांना या मोबाइलमधील वेगवेगळे ॲप कसे वापरावेत, याची माहिती त्यांना नसते. अशा वेळी काही चोरट्यांकडून त्यांना लक्ष केले जाते. त्यांच्या खात्यातील पैसे मोबाइलमधून कसे काढता येतील, यासाठी चोरटे प्रयत्नशील असतात. परभणीत काही ज्येष्ठ नागरिकांचे पैसे गायब झाले आहेत.

ही घ्या काळजी

मोबाइलला कायमस्वरूपी पासवर्ड दिलेला असावा. सार्वजनिक ठिकाणांवरील वायफायचा वापर करू नये. आपला डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी मोबाइलची अँड्रॉइड सिस्टम नेहमी अपडेट असावी. आधार कार्डचा ओटीपी कोणालाही सांगू नये, तसेच आधार कार्डची प्रत कोणालाही देऊ नये आणि आधार नंबर कोणालाही सांगू नये.