शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा कहर सुरूच; ५५३ रुग्ण एकाच दिवशी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, सलग दुसऱ्या आठवड्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ५ एप्रिल रोजी ...

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, सलग दुसऱ्या आठवड्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ५ एप्रिल रोजी ५५३ रुग्ण नव्याने नोंद झाले असून, आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर धोकादायक पद्धतीने वाढला आहे.

मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. सुरुवातीला १०० ते २०० रुग्ण दररोज नोंद होत होते. आता ही संख्या ४०० पेक्षाही अधिक झाली असून, सोमवारी एकाच दिवशी ५५३ रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य विभागाला २ हजार ४१५ जणांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ६९९ अहवालामध्ये २८६, तर रॅपिड टेस्टच्या ७१६ अहवालामध्ये २६७ जण पॉझिटिव्ह आहेत.

रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. सोमवारी एकूण ८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे ४५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६ हजार ८२६ झाली असून, त्यापैकी १३ हजार १९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३ हजार १७७ रुग्ण उपचार घेत आहेत.

येथील आयटीआय हॉस्पिटलमध्ये १५८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये १९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील खासगी रुग्णालयात ३६६ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच अक्षदा मंगल कार्यालयात ८३, तर होम आयसोलेशनमध्ये २ हजार ३३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शासकीय रुग्णालयात पावणे

पाचशे रुग्ण

परभणी शहरातील शासकीय संस्थांमध्ये ४७९ रुग्ण उपचार घेत आहेत, तर दुसरीकडे शहरातीलच सर्व खासगी रुग्णालयांमध्ये मिळून ३६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शासकीय संस्थांमध्ये रुग्णांसाठी खाटा उपलब्ध असल्या तरी खासगी रुग्णालयात मात्र खाटा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.