शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट बंधारा गैरसोयीचा ठरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST

विनापरवाना दारू वाहतूक वाढली पाथरी: तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री करण्याच्या उद्देशाने होणारी विनापरवाना दारू वाहतूक तालुक्यात ...

विनापरवाना दारू वाहतूक वाढली

पाथरी: तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री करण्याच्या उद्देशाने होणारी विनापरवाना दारू वाहतूक तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने अवैध दारू विक्री करणार्‍यांना मोकळे रान सुटले आहे. याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.

वादळी वाऱ्याने पिकांचे नुकसान

सेलू: अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे ज्वारी व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुका महसूल प्रशासनाने या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

वर्षभरात २ हजार ५०० रुग्णांचे उद्दिष्ट

परभणी : शासनाने क्षयरोग मुक्तीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांनाही क्षय रोग रुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. वर्षभरात जिल्ह्यात २ हजार ५०० रुग्णांचे उद्दिष्ट आहे.

महागाईच्या भडक्याने नागरिक त्रस्त

परभणी : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबरोबरच गोडेतेलाचा भावही वधारल्याने नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. गोडतेल प्रतिकिलो १५० रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील भाववाढीने नागरिक आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

झरी-आसेगाव रस्त्याची दुरवस्था

झरी : रस्त्याच्या मधोमध झालेल्या असंख्य खड्ड्यांमुळे झरी ते आसेगाव रस्त्याची पूर्णत: चाळणी झाली आहे. परिणामी वाहन धारकांना, प्रवाशांना आदळ आपट करीत प्रवास करावा लागत आहे. दुसरीकडे झरी ते साडेगाव फाट्यापर्यंत कंत्राटदाराने रस्त्यांवर गिट्टी अंथरली आहे.

पाणी पातळीवर होणार परिणाम

सेलू : तालुक्यातील दुधना नदीच्या पात्रातील वाळू उपशामुळे मोरेगाव, राजवाडी, वालूर, काजळी रोहिणी व गावांतील पाणी पातळीवर परिणाम होऊन पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण होत आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

कृत्रिम वाळूचा जिल्ह्यात वापर वाढला

परभणी : वाळूचे दर गगनाला भिडलेले असल्याने इमारत, रस्ते व पुलाच्या बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा वापर जिल्ह्यात वाढला आहे. मात्र, दुसरीकडे खासगी व शासकीय कामांवर कृत्रिम वाळूचा वापर वाढल्याने या बांधकामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.