शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

आंबेडकर-जरांगे फॅक्टरचा परभणीत महाविकास आघाडीलाच बसणार सर्वाधिक तडाखा

By ज्ञानेश्वर भाले | Published: March 28, 2024 7:38 PM

लोकसभा निवडणुकीची रणनीती: परभणी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुरूवारपासून (दि. २८) नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरूवात झाली असून, इच्छुक उमेदवारांना ४ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येईल.

परभणी : जिल्ह्यासह राज्याचे राजकीय गणित दिवसागणिक बदलत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात नेमकं कोण कुणाच्या विरोधात उभे राहते, याचा अंदाज बांधला जात नसल्याची स्थिती आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या ॲड. प्रकाश आंबेडकरांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने अनेक तर्क-विर्तकांना उधाण आले आहे. या दोन्ही नेत्यांनी जर लोकसभा निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याचे निश्चित केल्यास याचा मोठा प्रभाव इतर राजकीय पक्षांवर पडू शकतो. राजकीयदृष्ट्या याचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडीलाच बसण्याची शक्यता आहे. कारण २०१९ मधील परभणी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जवळपास दीड लाख मते घेतली होती. त्यामुळे जरांगे पाटलांनी जर वंचितसोबत निवडणुकीला सामोरे जाण्याचे निश्चित केले तर दोन्ही नेत्यांचे अस्तित्व नजरेआड करता येणार नाही.

परभणी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुरूवारपासून (दि. २८) नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरूवात झाली असून, इच्छुक उमेदवारांना ४ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येईल. मात्र, अद्यापही निवडणूक रिंगणात कोण कुणाविरुद्ध असणार, याबाबत संभ्रम असल्यामुळे लोकसभेच्या आखाड्यात अद्यापही रंगत आलेली नाही. बुधवारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराची घोषणा झाल्याने एका बाजूने अधिकृतरीत्या संजय जाधव हे उमेदवार म्हणून पुढे आले. मात्र, महायुतीचे अद्यापही त्रांगडेच असल्यामुळे नेमकी ही जागा कोणत्या पक्षाला जाते, यावर तर्कवितर्क लावले जात आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक आहेत. परंतु, महायुतीने अद्यापही आपले पत्ते खुले केले नसल्याने इच्छुक उमेदवारांची घालमेल सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जवळपास आली होती. कारण गत काही निवडणुकींचा विचार करता शिवसेनेविरुद्ध आजपर्यंत राष्ट्रवादीचा उमेदवार लोकसभेच्या आखाड्यात होता. मात्र, यावेळी राजकीय गणित बदलल्यामुळे ही जागा नेमकी महायुतीत राष्ट्रवादीला जाते की भाजपकडे यावर तर्कवितर्क लावण्यात येत होते. शेवटी राष्ट्रवादी अधिक आग्रही असल्यामुळे परभणीची जागा त्यांनाच जाईल, असे वाटत असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी महायुतीत उडी घेतल्यामुळे पुन्हा संभ्रम वाढला आहे.

२०१९ च्या निवडणुकीत दीड लाख मतेगत लोकसभा (२०१९) निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून आलमगीर खान यांना तब्बल एक लाख ४९ हजार ९४६ मते पडली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा जिल्ह्यात प्रभाव असल्याचे संबंधित निवडणुकीत पुढे आले होते. वंचितमुळे मतांचे विभाजन झाल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचा अंदाज आजही बांधला जात आहे.

एकत्र निवडणूक लढण्यास मतांची विभागणीवंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर आणि मराठा आंदोलन नेते मनाेज जरांगे पाटील यांनी जर लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा परिणामी परभणीसह राज्यातील बहुतांश मतदारसंघात दिसून येईल. कारण जातीय समीकरण न पाहता गत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने परभणी लोकसभेच्या रिंगणात जवळपास दीड लाखांच्या मतांचा टप्पा गाठला होता. यात वंचितला जर मनोज जरांगे पाटलांची साथ लाभल्यास मतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडीलाच अधिक बसणार असल्याची स्थिती आहे.

आंदोलनामुळे एकवटला समाजमराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जरांगे पाटील गत काही महिन्यांपासून लढत आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने त्यांचा प्रभाव निवडणूक काळात कमी लेखता येणार आहे. हजारोंच्या संख्येने जरांगे पाटलांच्या सभेला जिल्हानिहाय मराठा समाजबांधवांची गर्दी दिसून येत होती. लोकसभेच्या उमेदवारीबाबत त्यांनी मतदारसंघनिहाय एका उमेदवाराची शिफारस करण्याचे निर्देश दिले असून, ३० मार्चनंतर त्यावर निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसात ते कुठला निर्णय घेणार, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील