शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीसाठी ५४ उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:14 IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे एका उमेदवाराने अर्ज ...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे एका उमेदवाराने अर्ज दाखल केला होता. गुरुवारी परभणी तालुक्यात १३, जिंतूर तालुक्यात ७, पूर्णा तालुक्यात ४, सेलू ११, मानवत २, पाथरी ५, सोनपेठ ७, गंगाखेड १ आणि पालम तालुक्यात ४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. परभणी तालुक्यातील मांडाखळी ग्रामपंचायतीमध्ये ९, कुंभारी ग्रामपंचायतीत ३ तर एकुरखा तर्फे पेडगाव ग्रामपंचायतीत १ उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. सेलू तालुक्यात एकूण ११ अर्ज दाखल झाले. त्यात चिकलठाणा बु. ३, चिकलठाणा खु. ३, रायपूर ३, खेर्डा १ आणि नागठाणा ग्रामपंचायतीत १ अर्ज दाखल झाला. जिंतूर तालुक्यातील करवली येथे ३ आणि चारठाणा येथे ४ असे ७ अर्ज, पालम तालुक्यात २ ग्रामपंचायतीसाठी २ अर्ज, सोनपेठ तालुक्यातील खडका ग्रामपंचायतीत ४ तर लासिना ग्रामपंचायतीत ३ असे ७ अर्ज दाखल झाले आहेत. गंगाखेड तालुक्यात राणीसावरगाव ग्रामपंचायतीत १, मानवत तालुक्यातील सोमठाणा, राजुरा आणि आटोळा ग्रुप ग्रामपंचायत आणि गोगलगाव ग्रामपंचायतीत प्रत्येकी १ असे २ अर्ज दाखल झाले आहेत. पाथरी तालुक्यातील विटा ग्रामपंचायतीसाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

दोन दिवस सुटीचे

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुटीचे आल्याने सोमवारीच अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे.