शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यात क्षयरोगाचे १६८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : क्षयरोगाच्या रुग्णांना शोधून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी येथील जिल्हा क्षयरोग विभागाकडून प्रयत्न केले जात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : क्षयरोगाच्या रुग्णांना शोधून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी येथील जिल्हा क्षयरोग विभागाकडून प्रयत्न केले जात असून, दोन महिन्यांमध्ये १६८ रुग्णांचा शोध घेण्यात आला आहे.

इतर गंभीर आजारांप्रमाणेच क्षयरोगाचा समावेश गंभीर आजारांच्या यादीमध्ये झाला आहे. त्यामुळे शासनाने क्षयरोग मुक्तीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांनाही क्षयरोग रुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट दिले जाते. जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरात क्षयरोग विभागाकडून रुग्णांचा शोध घेतला जातो. यावर्षी जिल्ह्याला २ हजार ५०० रुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये शासकीय रुग्णालयांना १ हजार ९०० तर खासगी रुग्णालयांना ६०० रुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. दोन महिन्यांच्या काळात शासकीय रुग्णालयांनी ११० रुग्णांचा शोध घेतला आहे तर दुसरीकडे खासगी रुग्णालयातून ५८ रुग्णांची नोंदणी झाली आहे. गतवर्षी कोरोनाचा संसर्ग असल्याने जिल्ह्यातील सर्व यंत्रणा हा संसर्ग रोखण्यात गुंतली होती. कोरोना वगळता इतर आजारांचे रुग्णही मोठ्या संख्येने कमी झाले. क्षयरुग्णांच्या संदर्भातही असाच प्रकार झाला होता. कोरोनाच्या या संकटामुळे गतवर्षी जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ५६ टक्के रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू झाले होते. यावर्षी हे प्रमाण वाढविण्यासाठी क्षयरोग विभाग प्रयत्न करत आहे. दोन महिन्यांमध्येच १६८ रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू केल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कालिदास निरस यांनी दिली.

खासगी रुग्णालयांना रुग्णांची नोंद करणे बंधनकारक

क्षयरोगाचा समावेश गंभीर धोकादायक आजारांच्या यादीत झाल्याने क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम राबविला जातो. त्यामुळे खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पॅथॉलॉजी लॅब, रेडिओलॉजिस्ट आणि औषध विक्रेत्यांना त्यांच्याकडे निदान झालेल्या क्षयरुग्णांची नोंद शासनाकडे करणे बंधनकारक आहे, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कालिदास निरस यांनी सांगितले.

२०२५पर्यंत क्षयरोगमुक्त भारत हा संकल्प करण्यात आला असून, त्यानुसार आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहीम राबविली जात आहे. अनेक क्षयरुग्ण खासगी पॅथॉलॉजी लॅब, औषध विक्रेत्यांकडे जावून औषधाेपचार करतात. त्यामुळे शासनाकडे या रुग्णांची नोंद राहात नाही. त्यामुळे राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये नोंद झालेल्या सर्व क्षयरुग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी, पीपीएम समन्वयक किंवा शेजारच्या शासकीय आरोग्य संस्थेकडे सादर करावी, असे आवाहन निरस यांनी केले आहे.

क्षयरोगाची लक्षणे

दोन आठवड्यांपर्यंत खोकल्याचा त्रास, हलका ताप, भूक मंदावणे, खोकलताना रक्त पडणे अशी क्षयरोगाची लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळल्यास रुग्णांनी शासकीय रुग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.