शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

रोहितचे शतक व्यर्थ, भारत पराभूत

By admin | Updated: January 19, 2015 03:22 IST

सलामीवीर अ‍ॅरोन फिंचला शतकाने हुलकावणी दिली असली, तरी त्याने केलेल्या ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान आॅस्ट्रेलियाने रविवारी भारताचा ४ गडी राखून पराभव केला

मेलबोर्न : सलामीवीर अ‍ॅरोन फिंचला शतकाने हुलकावणी दिली असली, तरी त्याने केलेल्या ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान आॅस्ट्रेलियाने रविवारी भारताचा ४ गडी राखून पराभव केला आणि वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेत सलग दुसरा विजय मिळवीत अंतिम फेरीच्या दिशेने आश्वासक आगेकूच केली. भारताच्या रोहित शर्माची (१३८) शतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. भारताने दिलेल्या २६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाने फिंचच्या (९६ धावा, १२७ चेंडू, ५ चौकार, २ षटकार) अर्धशतकी खेळीच्या जोरावर ४९ षटकांत विजयासाठी आवश्यक धावा ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. त्याआधी, मिशेल स्टार्कच्या (४३ धावांत ६ बळी) आॅस्ट्रेलियाने भारताचा डाव ८ बाद २६७ धावांत रोखला. भारताच्या डावात शतकवीर रोहित शर्मासह सुरेश रैनाचे (५१) योगदान उल्लेखनीय ठरले. फिंचच्या खेळीमुळे आॅस्ट्रेलियाला प्रतिकूल परिस्थिीतही लक्ष्य गाठण्यात यश आले. फिंचने डेव्हिड वॉर्नरसह (२४) सलामीला ५१ धावांची, शेन वॉटसनसोबत (४१) दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची, कर्णधार स्टिव्हन स्मिथसोबत (४७) तिसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी करीत आॅस्ट्रेलियाच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. भारताने अखेरच्या षटकांमध्ये अचूक मारा करीत आॅस्ट्रेलियावर दडपण निर्माण केले; पण अखेर यजमान संघ विजय मिळविण्यात यशस्वी ठरला. भारतातर्फे उमेश यादवने ५५ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. आॅस्ट्रेलियाने तिरंगी मालिकेत सलामी लढतीत इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव केला होता. भारताला आता दुसऱ्या लढतीत २० जानेवारी रोजी इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना फिंच व वॉर्नर यांनी आॅस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी नवव्या षटकात आॅस्ट्रेलियाला धावसंख्येचे अर्धशतक गाठून दिले. यादवने वॉर्नरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या वॉटसनने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला. वॉटसन वैयक्तिक २८ धावांवर असताना सुदैवी ठरला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्याच्याविरुद्धचे पायचितचे अपील पंचानी फेटाळले. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या वॉटसनला (४१ धावा, ३९ चेंडू, ५ चौकार, १ षटकार) पटेलने तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर अश्विनने कर्णधार जॉर्ज बेली (५), तर भुवनेश्वरने ग्लेन मॅक्सवेलला (२०) बाद करीत यजमान संघावर दडपण निर्माण केले. ब्रॅड हॅडिन (नाबाद १३) व जेम्स फॉकनर (नाबाद ९) यांनी आॅस्ट्रेलियाला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. रोहित शर्माच्या शतकी खेळीमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. रोहितचे काराकिर्दीतील सहावे, तर आॅस्ट्रेलियाविरुद्धचे हे तिसरे शतक आहे. रोहित व रैना यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करीत डाव सावरला. कर्णधार धोनी (१९) बाद झाला. अखेरच्या १० षटकांत भारताने ४ विकेटचे मोल देत केवळ ६१ धावा फटकाविल्या. (वृत्तसंस्था)