शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
3
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
4
लैंगिक अत्याचारातील गुन्हेगारांना पॅरोल मिळणं बंद होणार; पण कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते?
5
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
6
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
7
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
8
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
9
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
10
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
11
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
12
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
13
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
14
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
15
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
16
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
17
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
18
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
19
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
20
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

रणजी स्पर्धेत मुंबईचा विजयी भांगडा

By admin | Updated: October 13, 2015 03:03 IST

अखिल हेरवाडकरने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे पंजाबच्या फलंदाजांनी अक्षरक्ष: लोटांगण घातले. अखिलने चौथ्या दिवशी पंजाबच्या ६ फलंदाजांना बाद करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

मुंबई : अखिल हेरवाडकरने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे पंजाबच्या फलंदाजांनी अक्षरक्ष: लोटांगण घातले. अखिलने चौथ्या दिवशी पंजाबच्या ६ फलंदाजांना बाद करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. एक डाव आणि १२ धावांनी पंजाब संघाला पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या डावात द्विशतक झळकवणाऱ्या मुंबईच्या श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. रणजी सामन्याच्या ग्रुप बी गटात मुंबईने ८ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. ग्रुप बी गटात मुंबईने दुसऱ्या लढतीत पहिल्या दिवसापासून दबदबा कायम ठेवला. विशेष म्हणजे, फलंदाजांनी चोख भूमिका पार पाडल्यानंतर मुंबईकरांच्या नजरा खिळल्या त्या गोलंदाजांच्या कामगिरीकडे. ४ बाद २४४ अशा स्थितीत पंजाब संघ चौथ्या दिवशी मैदानात उतरला. मनदीप सिंग (११३) आणि हिमांशू चावला (४५)ने सुरुवातीला आक्रमक फटकेबाजी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या जोडीने पाचव्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. अर्धशतकापासून केवळ ५ धावा दूर असताना बलविंदरच्या एका अप्रतिम चेंडूवर हिमांशू पायचित झाला. कर्णधार आदित्य तरेने अखिलच्या हाती चेंडू सोपवला आणि मुंबईने विजयाच्या दिशेने चाल केली. मनदीपने गीतांश खेराच्या साथीने डाव पुढे नेला. खेराने सुंदर फटकेबाजी करत ८६ धावांचे योगदान दिले. मात्र अखिलने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत पहिला बळी मिळवला. त्याने मनदीप (११६)ला मंगेलाच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. परिणामी, पंजाबच्या शेवटच्या आशादायी जोडीला सुरुंग लावला. ६ बाद ३३८ अशी स्थिती असताना सिद्धार्थ कौल (९), सरबजीत लढ्ढा (०) १२ धावांच्या अंतराने बाद झाले. खेरा (८६) बाद होताच पंजाबची शेवटची आशा संपुष्टात आली. पंजाबची ९ बाद ३९८ अशी अवस्था झाली होती; तर मुंबईकडे अद्यापही १८ धावांची आघाडी होती. शेवटचा गडीदेखील अखिलने टिपला. बी. सरन (१५) जोरदार फटका लगावण्याच्या प्रयत्नात असताना त्याने शार्दुलच्या हाती झेल दिला. अखेर ४०३ धावांवर पंजाबचा डाव संपुष्टात आला. या पराभावामुळे गुणतालिकेत पंजाबची चौथ्या स्थानावर घसरण झाली. सामन्यात विजयश्री मिळवून मुंबईचा संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला. पहिल्या डावात दमदार द्विशतक झळकावणारा मुंबईकर श्रेयस अय्यर सामनावीर ठरला. तिसऱ्या सामन्यात मुंबईला तामिळनाडू संघाचे आव्हान असणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)मुंबई : पहिला डाव ८ बाद ५६९ (घोषित )पंजाब : पहिला डाव सर्वबाद १५४ आणि दुसरा डाव सर्वबाद ४०३पंजाब (दुसरा डाव) : मनन वोहरा झे. तरे गो. ठाकूर ६, जीवनज्योत सिंग धावचित हरमित सिंग ९१, उदय कौल झे. मंगेला गो. हरमित सिंग २०, युवराज सिंग त्रिफळाचित हेरवाडकर १४, मनदीप सिंग झे. मंगेला गो. हेरवाडकर ११६, हिमांशू चावला पायचित संधू ४५, गीतांश खेरा झे. यादव गो. हेरवाडकर ८६, सिद्धार्थ कौल झे. मंगेला गो. हेरवाडकर ९, सरबजीत लढ्ढा पायचित हेरवाडकर ०, बी सरन झे. ठाकूर गो. हेरवाडकर ०, व्ही खन्ना नाबाद १. अवांतर - १, एकूण- १२७.२ षटकांत सर्वबाद ४०३ गोलंदाजी : धवल कुलकर्णी १९-४-६१-०; शार्दूल ठाकूर १७-१-७३-१; बलविंदर संधू २२-८-५६-१; अभिषेक नायर १३-१-३९-०; हरमित सिंग ३३-३-११७-१, अखिल हेरवाडकर २२.२-५-५२-६, सिद्धार्थ लाड १-०-५-०.