शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:46 IST

Rahul Gandhi Latest news Marathi: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेस आणि इतर मित्रपक्षातील नेते, कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत. त्यांना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सुनावले. 

"हे संकुचित राजकारण बाजूला ठेवा. हा निकाल कोणत्याही एक किंवा दोन पक्षाबद्दलचा नाहीये. ही भारताबद्दलची घटना आहे", असे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसमधील आणि इतर मित्रपक्षातील नेत्यांचे कान टोचले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील काही नेते-कार्यकर्ते आणि इतर समविचारी पक्षातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यावरून राहुल गांधींनी संताप व्यक्त केला. 

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक पोस्ट केली आणि कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे. 

हे भाजपाचे लोकशाही संपवण्याचे दिशेने मोठे पाऊल 

राहुल गांधी म्हणाले, "काँग्रेस आणि दुसऱ्या पक्षांतील जे काही लोक तृणमूल काँग्रेसच्या पराभवामुळे आनंदित झाले आहेत, त्यांनी हे समजून घेतले पाहिजेत की, आसाम आणि पश्चिम बंगालमधील बहुमत चोरलेले आहे. भाजपाचे हे भारतीय लोकशाही संपवण्याच्या मोहिमेतील एक मोठे पाऊल आहे."

यापूर्वी केलेल्या एका पोस्टमध्ये राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर जागा चोरल्याचाही आरोप केला आहे. भाजपाने निवडणूक आयोगाची मदत घेऊन १०० जागा पश्चिम बंगालमध्ये चोरल्या असे राहुल गांधी म्हणाले आहेत. 

"आसाम आणि पश्चिम बंगाल ही ढळढळीत उदाहरणे आहेत की, भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने ही निवडणूक चोरली आहे. आम्ही ममता बॅनर्जी यांच्याशी सहमत आहोत. बंगालमध्ये १०० पेक्षा जास्त जागा चोरण्यात आल्या आहेत", असे राहुल गांधी म्हणालेले. 

पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी अमित शाहांवर 

२०७ जागा जिंकत पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमत मिळवलेल्या भाजपाने मुख्यमंत्री निवडीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. पक्षाच्या संसदीय मंडळाने पक्षाचा विधिमंडळ नेता निवडीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी हे सह-निरीक्षक आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi slams Congress, allies for celebrating TMC's defeat.

Web Summary : Rahul Gandhi criticized Congress members and allies celebrating TMC's loss in West Bengal. He stated BJP's victory was achieved undemocratically, calling it a step towards destroying Indian democracy. He alleged election commission helped BJP steal seats.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६tmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा