आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
1 / 10गेल्या ५० वर्षांचा इतिहास पाहिला तर या राज्यात फक्त तीन मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व केले आहे. ५० वर्षांमध्ये डाव्या आघाडीच्या राजवटीचा मोठा वाटा आहे.2 / 10डॉ. प्रफुल्लचंद्र घोष यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र पश्चिम बंगालचे पहिले 'प्रीमियर' (तेव्हा मुख्यमंत्री या पदाला प्रीमियर म्हटले जाई) म्हणून शपथ घेतली.3 / 10स्वातंत्र्यानंतर बिधानचंद्र रॉय यांनी १९४८ ते १९६२ या काळात बंगालचे नेतृत्व केले. मात्र, त्यानंतर १९६७ ते १९७२ या काळात राज्यात युती सरकारांमुळे अस्थिरतेचे वातावरण होते. 4 / 10१९ वर्षांनंतर, २१ नोव्हेंबर १९६७ रोजी प्रफुल्लचंद्र घोष जेव्हा पुन्हा सत्तेवर आले, तेव्हा त्यांचा कार्यकाळ केवळ २ महिने २९ दिवस इतका अल्प होता. यावेळी त्यांनी 'प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक अलायन्स फ्रंट'च्या युती सरकारचे नेतृत्व केले.5 / 10सिद्धार्थ शंकर राय यांच्या रूपाने काँग्रेसने आपली शेवटची मोठी खेळी खेळली. त्यांच्या कार्यकाळानंतर बंगालच्या राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलली.6 / 10पश्चिम बंगालच्या इतिहासातील सर्वात प्रभावी नाव म्हणजे ज्योती बसू. २१ जून १९७७ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आणि ५ नोव्हेंबर २००० पर्यंत, सलग पाच वेळा ते या पदावर विराजमान होते.7 / 10२३ वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. सीपीएम च्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले बसू ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.8 / 10ज्योती बसू यांच्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांनी १० वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपद सांभाळले. मात्र, २०११ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पराभवामुळे डाव्या आघाडीची तब्बल ३४ वर्षांची प्रदीर्घ सत्ता संपुष्टात आली.9 / 10२०११ मध्ये ममता बॅनर्जी यांनी बदलाची लाट आणत तृणमूल काँग्रेसची सत्ता स्थापन केली. तेव्हापासून आजतागायत त्या मुख्यमंत्रीपदी कायम होत्या. गेल्या ५० वर्षांतील तीन महत्त्वाच्या मुख्यमंत्र्यांच्या या यादीत त्यांचे नाव घेतले जाते.10 / 10पश्चिम बंगालच्या गेल्या ५ दशकांच्या राजकीय प्रवासात प्रामुख्याने ज्योती बसू, बुद्धदेव भट्टाचार्य आणि ममता बॅनर्जी या तीनच मुख्यमंत्र्यांच्या नावांचा मोठा प्रभाव जाणवतो. मात्र, इतर मुख्यमंत्र्यांचा लहान कार्यकाळामागेही एक मोठा राजकीय संघर्ष आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.