शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

टर्निंग विकेटवर फलंदाजांनी संयम राखण्याची गरज : शास्त्री

By admin | Updated: December 13, 2015 02:30 IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत विजय मिळवल्यानंतरही संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी भारतीय फलंदाजांना ‘टर्निंग विकेट’वर संयम राखण्याची

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत विजय मिळवल्यानंतरही संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी भारतीय फलंदाजांना ‘टर्निंग विकेट’वर संयम राखण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.शास्त्री यांनी बीसीसीआयच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये विराट कोहलीचे नेतृत्व आणि अजिंक्य रहाणे व शिखर धवन यांच्या फलंदाजीची प्रशंसा केली. शास्त्री म्हणाले, ‘भारतीय संघासाठी अडचण ही आहे, की आमचे खेळाडू स्थानिक क्रिकेट खेळत नाही आणि यात त्यांची चूक नाही. भारतीय संघाचा कार्यक्रम व्यस्त आहे. त्यामुळे फूटवर्क आणि टर्निंग खेळपट्ट्यांवर फूटवर्कमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. टर्निंग खेळपट्ट्यांवर उणिवा स्पष्ट होतात.’शास्त्री पुढे म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत भारतीय संघ विदेशात खेळला. ज्यावेळी मायदेशात खेळावे लागले त्यावेळी परिस्थिती बदललेली होती.’शास्त्री यांनी रहाणेची प्रशंसा केली. रहाणेने पहिल्या दोन कसोटी सामन्यांत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर तिसऱ्या लढतीत शानदार पुनरागमन केले. पहिल्या लढतीत तो बचावात्मक फटका खेळताना तर दुसऱ्यांदा तो आक्रमक फटका खेळताना बाद झाला. दिल्ली कसोटीत मात्र त्याने कामगिरीत सुधारणा केली.’ विराट कोहलीच्या नेतृत्वाची शास्त्री यांनी प्रशंसा करताना म्हटले, की ‘९ डिसेंबर २०१४ रोजी कोहलीने प्रथमच अ‍ॅडिलेडमध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले. वर्षभरानंतर तो जिगरबाज संघाचे नेतृत्व करीत आहे, असे वक्तव्य करू शकतो. विराट प्रत्येक ठिकाणी असतो आणि प्रत्येकासोबत संवाद साधतो. कर्णधारामध्ये ही कला असणे आवश्यक असते. (वृत्तसंस्था)