शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
3
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
4
लैंगिक अत्याचारातील गुन्हेगारांना पॅरोल मिळणं बंद होणार; पण कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते?
5
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
6
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
7
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
8
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
9
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
10
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
11
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
12
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
13
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
14
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
15
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
16
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
17
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
18
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
19
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
20
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

‘भारताने गोलंदाजांची हीच फळी कायम राखावी’

By admin | Updated: January 13, 2015 02:32 IST

आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत ०-२ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय गोलंदाजांना टीकेला सामोरे जावे लागले;

सिडनी : आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत ०-२ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय गोलंदाजांना टीकेला सामोरे जावे लागले; पण आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज डेमियन फ्लेमिंग याने वर्तमान संघातील गोलंदाजांच्या गटाला कायम राखले, तर भारतीय संघाला प्रदीर्घ कालावधीसाठी लाभ मिळेल, असे मत व्यक्त केले आहे.फ्लेमिंग म्हणाला, ‘‘माझ्या मते, गोलंदाजांच्या या गटाला शिकण्याची संधी देणे आवश्यक आहे. ईशांत शर्माच्या कामगिरीत सातत्य येत आहे. उमेश यादव व वरुण अ‍ॅरोन यांच्यामध्ये १४० किलोमीटर प्रतितास वेगाने मारा करण्याची क्षमता आहे. त्याचसोबत ते स्विंग मारा करण्यास सज्ज आहे. जगात अशी क्षमता असलेले गोलंदाज मोजके आहेत. त्यामुळे त्यांना अधिक संधी मिळायला हवी.’’फ्लेमिंग पुढे म्हणाला, ‘‘मोहंमद शमी प्रभावी गोलंदाज आहे; पण तो अधिक वेगाने गोलंदाजी करीत नाही. तो चेंडू स्विंग करतो. भुवनेश्वरला स्विंग गोलंदाजीचे वरदान लाभले आहे. अनुकूल परिस्थितीमध्ये भारताकडे त्याला खेळविण्याचा पर्याय उपलब्ध आहे.’’समालोचक झालेला फ्लेमिंग पुढे म्हणाला, ‘‘गोलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता न आल्यामुळे संघाच्या रणनीतीवर प्रभाव पडतो. माझ्या मते, भारताचे गोलंदाज मानसिकदृष्ट्या कणखर नाहीत. त्यांच्या गोलंदाजीमध्ये परिपक्वता दिसत नाही. ते झटपट यश मिळविण्यास प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. सध्याच्या क्रिकेटपटूंच्या पिढीमध्ये हे प्रामुख्याने दिसून येते. कसोटी क्रिकेटमध्ये धैर्य असणे गरजेचे असते आणि भारतीय गोलंदाजीमध्ये त्याचा अभाव दिसतो.’’आॅस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी धावा बहाल तर केल्याच; पण त्याचसोबत त्यांना आॅस्ट्रेलियाच्या २० विकेट घेण्यात अपयश आले. पाहुण्या संघाच्या गोलंदाजांनी यजमान संघाच्या गोलंदाजांकडून धडा घ्यावा, असेही फ्लेमिंग म्हणाला.फ्लेमिंगने पुढे सांगितले, की भारतीय गोलंदाजांना लेंथमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. रॅन हॅरिसप्रमाणे आपल्याही चेंडूला टप्पा कसा असावा, याचा सराव करणे आवश्यक आहे. हॅरिस फलंदाजाला अधिकाधिक चेंडू खेळण्यास बाध्य करतो. भारतीय गोलंदाजांनी उजव्या यष्टिबाहेर मारा करण्याचे निश्चित करावे. भारतीय संघ मायदेशात सहज विजय मिळवितो; पण विदेशात विजय मिळविण्यासाठी त्यांना चांगली कामगिरी करणे शिकावे लागेल. आॅस्ट्रेलियासह विश्व क्रिकेटमधील सर्व संघ सध्याचा तसा प्रयत्न करीत आहेत. भारतीय गोलंदाजांनी सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी निराशाजनक कामगिरी केली. त्यांनी एका सत्रात २१३ धावा बहाल करताना प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलिया संघाला विजयाची संधी बहाल केली. (वृत्तसंस्था)