शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

भारत २०० धावांत गारद

By admin | Updated: June 22, 2015 01:33 IST

भारतीय फलंदाज बांगलादेशचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानविरुद्ध संघर्ष करीत असल्याचे चित्र रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डे

मीरपूर : भारतीय फलंदाज बांगलादेशचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानविरुद्ध संघर्ष करीत असल्याचे चित्र रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डे लढतीतही कायम राहिले. मुस्तफिजुरच्या (६-४३) अचूक माऱ्याच्या जोरावर यजमान बांगलादेशने दोनदा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणाऱ्या भारतीय संघाचा डाव ४५ षटकांत २०० धावांत गुंडाळला. पावसाच्या व्यत्ययामुळे ही लढत प्रत्येकी ४७ षटकांची खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. १९ वर्षीय वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर पहिल्या दोन वन-डे सामन्यांत दोनदा पाच बळी घेण्याची कामगिरी करणारा वन-डे क्रिकेट इतिहासातील दुसरा गोलंदाज ठरला. झिम्बाब्वेचा डावखुरा वेगवान गोलंदाज ब्रायन व्हिटोरीने यापूर्वी अशी कामगिरी केली होती. बांगलादेशपुढे डकवर्थ-लुईस नियमानुसार ४७ षटकांत २०० धावा फटकावण्याचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या केवळ पाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदवण्यात यश आले. शिखर धवनने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली. कर्णधार धोनी (४७) व सुरेश रैना (३४) यांनी संघर्षपूर्ण खेळी केली. पदार्पणाच्या लढतीत पाच बळी घेणाऱ्या मुस्तफिजुरला नासिर हुसेन व रुबेल हुसेन यांनी प्रत्येकी दोन बळी घेत योग्य साथ दिली. मुस्तफिजुर पहिल्या दोन सामन्यांत ११ बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला. त्याने झिम्बाब्वेच्या ब्रायन व्हिटोरीचा (१० बळी) विक्रम मोडला. मुस्तफिजुरच्या भेदक माऱ्यापुढे भारताला पहिल्या लढतीत ७९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. भारताची ४३.५ षटकांत ८ बाद १९६ अशी अवस्था असताना पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यानंतर जवळजवळ दोन तास खेळ शक्य झाला नाही. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला त्यावेळी बांगलादेशने केवळ सात चेंडूंच्या अंतरात भारताच्या उर्वरित दोन फलंदाजांना माघारी परतवले. यानंतर बांगलादेशला ४७ षटकांत डकवर्थ लुईस नियमानुसार १९९ धावांचे लक्ष्य मिळाले. यजमानांनी सावध सुरुवात करताना विजयाच्या दिशेने कूच केलीअजिंक्य रहाणेला वगळण्याचा भारताचा निर्णय चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. रोहित शर्मा (०) खाते न उघडताच डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर धवन व विराट कोहली (२३) यांनी सावधगिरी बाळगत फलंदाजी केली. कोहलीने मुस्तफिजुरच्या गोलंदाजीवर षटकार व चौकार वसूल करीत आपले इरादे स्पष्ट केले. धवनने मुर्तजाच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार ठोकले. नासिर हुसेनने कोहलीला पायचित करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. कोहली व धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. भारतीय संघ दडपणाखाली असताना कर्णधार धोनीने वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धोनी वैयक्तिक २० धावांवर असताना नासिर हुसेनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक लिट्टन दासने त्याला जीवदान दिले. दासने याच षटकात त्यानंतर धवनचा झेल टिपत भारताला तिसरा धक्का दिला. धवनने ६० चेंडूंच्या खेळीमध्ये ७ चौकार लगावले. अंबाती रायडू (०) चुकीचा फटका खेळून बाद झाला. त्यानंतर धोनी व रैना यांनी पाचव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी करीत डाव सावरण्याच्या आशा निर्माण केल्या, पण मुस्तफिजुरने पॉवर प्लेमध्ये रैना, धोनी व पटेल यांना माघारी परतवत बांगलादेशला वर्चस्व मिळवून दिले. भारताने पॉवर प्लेमध्ये १७ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाज गमावले. रविंचद्रन अश्विनला (४) बाद करीत सामन्यातील पाचवा बळी घेणारा मुस्तफिजुर अखेरच्या षटकात गोलंदाजी करीत असताना पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला. पावसानंतर त्याने जडेजला (१९) बोल्ड केले. हुसेनने भुवनेश्वरला बाद करीत भारताचा डाव संपुष्टात आणला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा बांग्लादेशने १० षटकांत १ बाद ४९ धावा अशी मजल मारली होती.