शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक फॉरमॅटला वेगळा कर्णधार नको

By admin | Updated: January 14, 2017 01:22 IST

क्रिकेटमधील प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार नेमण्याची व्यवस्था भारतात यशस्वी ठरणार नाही, असे सांगत महेंद्रसिंग धोनीने

पुणे : क्रिकेटमधील प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार नेमण्याची व्यवस्था भारतात यशस्वी ठरणार नाही, असे सांगत महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे शुक्रवारी समर्थन केले. भारतीय क्रिकेटविश्वातील सर्वांत यशस्वी कर्णधार असलेल्या ‘कॅप्टन कूल’ माहीने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्योने नेहमीच्याच बेधडक पद्धतीने प्रश्नांचे बाऊन्सर परतवून लावले. भारत-इंग्लंड यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील पहिली लढत येत्या रविवारी पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) मैदानावर होत आहे. एकदिवसीय संघाचा नियमित कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही पहिलीच लढत असेल. आपण कधीच ‘स्प्लिट कॅप्टन्सी’च्या बाजूने नव्हतो, असे नमूद करून धोनी म्हणाला, ‘‘माझ्या मते, सर्व प्रकारांसाठी एकच कर्णधार असावा. भारतातही अशी व्यवस्था चालत नाही. विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आल्यानंतर एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही त्याच्याकडे द्यावे, यासाठी मी योग्य वेळेची प्रतीक्षा करीत होतो. ही योग्य वेळ आता आली असल्याचे मला वाटले आणि मी वन-डे आणि टष्ट्वेंंटी-२0च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.’’ (क्रीडा प्रतिनिधी)कर्णधारपदाच्या प्रवासाचा आनंद लुटलादीर्घकाळ भारतीय संघाचे नेतृत्व केल्यानंतर हे पद सोडताना तुला काय वाटते, या प्रश्नाच्या उत्तरात धोनी म्हणाला, ‘‘कर्णधारपदाच्या काळाकडे मी एक प्रवास म्हणून पाहतो. २००४मध्ये मी संघात आलो. २००७मध्ये माझ्याकडे सर्वप्रथम संघाची धुरा सोपविण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंतच्या प्रवासात अनेक गोष्टी बदलल्या. त्यानुसार माझी भूमिका बदलली. प्रथम कर्णधार झालो तेव्हा संघात अनेक सिनियर खेळाडू होते. त्यांच्या निवृत्तीनंतर पोकळी निर्माण होऊ नये, म्हणून आधीपासूनच मी नव्या दमाच्या खेळाडूंना तयार करण्याचे प्रयत्न केले. सीनियर्स निवृत्त झाल्यावर ज्युनिअर्सनी आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडली. ते भारतीय क्रिकेटचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे, याचा आनंद वाटतो. कर्णधारपदाच्या कालखंडात अनेक उतार-चढाव आले; मात्र आयुष्यात मी कुठल्याच गोष्टीचा पश्चात्ताप करीत नाही. मी या प्रवासाचा आनंद लुटला.’’बीसीसीआयला आधीच कल्पना दिली होती...बीसीसीआयच्या दबावाखाली धोनीने एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. हे वृत्त अप्रत्यक्षपणे फेटाळून लावताना तो म्हणाला, ‘‘बीसीसीआयला खूप आधी मी या निर्णयाबाबत कळविले होते. २०१४मध्ये आॅस्ट्रेलिया दौरा आटोपल्यानंतर मी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून एकदिवसीय संघाचेही नेतृत्व सोडण्याचा विचार मनात घोळत होता. योग्यवेळी तो अमलात आणला.’’