शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना ‘दिवाळी’ भेट

By admin | Updated: October 27, 2015 00:38 IST

गडचिरोलीमधील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचविण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. नवरात्रीमध्ये बंदोबस्ताचा प्रचंड ताण असतानाही शहरवासीयांना मदतीचे आवहान केले

नामदेव मोरे, नवी मुंबईगडचिरोलीमधील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचविण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. नवरात्रीमध्ये बंदोबस्ताचा प्रचंड ताण असतानाही शहरवासीयांना मदतीचे आवहान केले. या आवाहनाला प्रतिसाद देऊन पनवेल, नवी मुंबईमधील हजारो नागरिकांनी जुनी, नवी कपडे, भांडी व इतर साहित्य जमा केले आहे. तब्बल दोन ट्रक साहित्य आतापर्यंत जमा केले आहे. हे सर्व साहित्य लवकरच आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. नवी मुंबई पोलिसांनी मागील काही महिन्यांपासून गुन्हे प्रकटीकरणापासून नागरिकांशी संवाद वाढविण्यापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत. गणपती व नवरात्र उत्सव शांततेमध्ये पार पाडला. बंदोबस्त सुरू असतानाच पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे उपायुक्त विश्वास पांढरे व परिमंडळ एकचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी आदिवासींना मदत करण्याचे आवाहन नागरिकांना केले. शहरामधील नागरिकांना सर्व भौतिक सुविधा सहज मिळत आहेत. परंतु येथून ७६४ किलोमीटर दूर असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील पाच लाखांपेक्षा जास्त आदिवासी नागरिकांना प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. अंगावर पुरेशी कपडे नाहीत. घरामध्ये आवश्यक भांडी व इतर साहित्य नाही. अत्यंत हालाकीचे जीवन विनातक्रार आदिवासी जगत आहेत. शहरामधील नागरिकांनी उत्सवांमधील व इतर वेळीही अनावश्यक खर्च कमी करून आपल्याकडील जुने, शक्य असेल तर नवीन कपडे, भांडी व इतर साहित्य पोलिसांकडे जमा करावे. हे साहित्य आदिवासींपर्यंत पोहोचविले जाईल. आपली छोटीशी मदत हजारो आदिवासींचे जीवनमान उंचावू शकेल, असे आवाहन केले होते. पोलिसांच्या आवाहनाला नवी मुंबई व पनवेलकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. शहरातील राजकीय पक्ष, गृहनिर्माण सोसायट्या, सामाजिक संस्था व इतर नागरिकांनी स्वेच्छेने घरोघरी जाऊन कपडे व भांडी गोळा केली. या मोहिमेला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. प्रत्येकाने स्वेच्छेने त्यामध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कपडे व इतर साहित्याचे ढीग जमा होऊ लागले. अनेक पोलीस स्टेशनच्या प्रमुखांनी टेंपो भरून साहित्य पनवेलमधील परिमंडळ दोनच्या कार्यालयाकडे पाठविले. नवी मुंबईमधील एनआरआय कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनीच एक टेंपो भरून साहित्य दिले. पोलिसांनी जुने कपडे देण्याचे आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांनी नवीन कपडेही मोठ्या प्रमाणात दिले आहेत. विशेषत: व्यापाऱ्यांनी चांगल्या वस्तू व नवीन कपडे खरेदी करून आदिवासींसाठी दिले आहेत. जवळपास दोन ट्रक भरेल एवढे साहित्य संकलित झाले आहे. लवकरच हे साहित्य आदिवासींपर्यंत पोहोचविले जाणार आहे.