शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स हॉस्पिटलचे उदघाटन, 50 कोटी जनतेला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 19:59 IST

ठाणे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 कोटी जनतेला उपचारांवरील खर्चातून मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. रिलायन्ससारख्या रुग्णालयानेही सर्वसामान्य जनतेला उत्तम आणि आधुनिक सेवा देऊन या "मोदी केअर" मध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबईतील कोपरखैरणे ...

ठाणे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 कोटी जनतेला उपचारांवरील खर्चातून मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. रिलायन्ससारख्या रुग्णालयानेही सर्वसामान्य जनतेला उत्तम आणि आधुनिक सेवा देऊन या "मोदी केअर" मध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटलचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

सरकार उच्च दर्जाच्या व परवडणाऱ्या सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गेल्या काही वर्षांत देशभरातील निदान केंद्रे आणि सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने विविध रोगांविषयी माहिती होऊन त्यावरील उपचारही उपलब्ध होत आहेत. मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी इतर देशांतून रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे. परवडणारी आणि सहज उपलब्ध असणारी वैद्यकीय सेवा आवश्यक बाब असून हेल्थकेअर क्षेत्रात आणखीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे नोकरीच्या संधीही वाढतील, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच रिलायन्सच्या रुग्णालय सेवेचे कौतूक करताना, रिलायन्सच्या या हॉस्पिटलमध्ये जनरल वार्डसुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने सुसज्ज केला आहे की, तेथील रुग्णही हे वातावरण पाहून लवकरच बरा होईल, असे फडणवीस म्हणाले. या हॉस्पिटलमध्ये सर्वाना समान दर्जाच्या सेवा व उपचार मिळणार आहेत. त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत सर्वांनाच एकसमान उपचारपद्धती मिळेल ही निश्चितच समाधानाची बाब आहे. रिलायन्सच्या या उपक्रमात राज्यातील अगदी छोट्या शहरांतही येणाऱ्या काळात 19 कॅन्सरवरील उपचार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. कॅन्सरचे वाढते प्रमाण पहाता याची मोठी आवश्यकता आहे आणि या समूहाची ही मोठी झेप ठरेल असे फडणवीस यांनी शेवटी म्हटले. दरम्यान, उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्रात कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती आहे. 

रिलायन्स हॉस्पिटलची वैशिष्टये

•    आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज •    अत्याधुनिक साधनसामुग्री•    संसर्ग होऊ नये म्हणून सुसज्ज रुम•    36 स्पेशल विभाग•    125 तज्ज्ञ डॉक्टर आणि 225 बेडस्•    4   आंतराष्ट्रीय  गुणवत्तेचे ऑपरेशन थिएटर•    रेडिएशन टेक्नोलॉजिसह अत्याधुनिक सुविधा 

टॅग्स :Relianceरिलायन्सDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसhospitalहॉस्पिटल