शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ई-कचऱ्यातून साकारला ‘भारत’

By admin | Updated: November 4, 2015 01:03 IST

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाने २२ जुन्या संगणकाच्या मदर बोर्डचा वापर करून देशाचा नकाशा तयार केला आहे. चार दिवस परिश्रम करून तयार केलेल्या साडेचार

नवी मुंबई : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाने २२ जुन्या संगणकाच्या मदर बोर्डचा वापर करून देशाचा नकाशा तयार केला आहे. चार दिवस परिश्रम करून तयार केलेल्या साडेचार फूट उंच व ४ फूट रुंदीच्या नकाशाला ‘मदर इंडिया बोर्ड’ असे नाव दिले आहे. पालिका प्रशासनाने टाकाऊपासून टिकावू वस्तू तयार करण्याचे आवाहन कृतिशीलतेमधून शहरवासीयांना केले आहे. देशातील सर्वच महानगरांमध्ये ई- कचऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. नादुरुस्त संगणक, मोबाइल व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे करायचे काय, त्यांची विल्हेवाट कशी लावायची, असो प्रश्न सर्वच महापालिका व शासकीय आस्थापनांना भेडसावू लागले आहेत. नवी मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात हा कचरा तयार होत आहे. ई-कचऱ्याचा पुनर्वापर करण्यात यावा. टाकाऊ वस्तूंपासून कलात्मक टिकाऊ वस्तू तयार कराव्या, असे आवाहन प्रशासनाने शहरवासीयांना केले होते. परंतु यासाठी सर्वांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी संगणकाच्या मदर बोर्डचा वापर करून देशाचा नकाशा तयार करण्याची संकल्पना मांडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन सोसायटी फोरम संस्थेचे कलावंत किशोर बिश्वास, बिनॉय के, अबू रमिझा, आॅल्विन आॅगस्टीन, अरीफ मोहम्मद शेख, जसपालसिंग नोएल, मच्छिंद्र पाटील यांनी नादुरुस्त संगणकाच्या २२ मदर बोर्डचा वापर करून चार दिवसांमध्ये साडेचार फूट उंच व ४ फूट रुंद देशाचा नकाशा तयार केला आहे. मदर बोर्डचा वापर करून तयार केलेला देशाचा नकाशा व भारतमाता ही भारतीयांच्या मनातील भावना एकत्र करून या बोर्डला ‘मदर इंडिया बोर्ड’ असे नाव दिले आहे. या नकाशामध्ये महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई व येथील मुख्यालयाचे स्थान दर्शविण्यात आले आहे. पालिका मुख्यालयामधील तिसऱ्या मजल्यावरील घनकचरा उपायुक्तांच्या दालनामध्ये ‘मदर इंडिया बोर्ड’ लावण्यात आला आहे. महापौर सुधाकर सोनावणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. आयुक्तांनी हा नकाशा तयार करणाऱ्या टीमच्या कल्पकतेचे कौतुक केले. ई- वेस्ट कलाविष्काराचा देशातील अभिनव उपक्रम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पर्यावरणरक्षण व पालिका क्षेत्राला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी अशाप्रकारे नवीन प्रयोग राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी डॉ. संजय पत्तीवार, अंकुश चव्हाण, जगन्नाथ सिन्नरकर, अमरीश पटनिगिरे, प्रकाश राजाळे, दादासाहेब चाबूकस्वार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)