शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
3
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
4
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
5
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
6
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
7
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
8
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
9
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
10
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
11
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
12
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
13
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
14
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
15
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
16
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
17
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
18
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
19
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
20
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘तिसरी मुंबई’वरून संघर्ष; २२.५ टक्के योजनेवर संताप

By नारायण जाधव | Updated: March 24, 2026 11:41 IST

हक्कांचा गळा घोटून भूसंपादन मान्य नाही : १२४ गावांचा इशारा

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कर्नाळा, साई आणि चिरनेर परिसरातील १२४ गावांतील जमिनीवर ‘नवनगर’ अर्थात ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पासाठी राज्य सरकारने १६ मार्च २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयाने संतापाची ठिणगी पेटली असून, शेतकरी थेट रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश धुडकावून २२.५% योजनेद्वारे भूसंपादन रेटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करून शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.

केंद्राच्या भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना अधिनियम, २०१३ नुसार बाजारभावाच्या चारपट रोख मोबदला आणि २० टक्के विकसित भूखंडाचा कायमस्वरूपी मालकी हक्क मिळणे अपेक्षित असताना, शासन मात्र १५.७५% भाडेपट्ट्याचा भूखंड देणारी २२.५% योजना लादत आहे. यामुळे “ही योजना नव्हे, हक्कांवर सरळ डाका आहे,” अशा शब्दांत संतप्त प्रतिक्रिया नोंदवून शेतकरी नेत्यांनी गावागावात बैठका घेणे सुरू केले आहे. आगामी काळात याप्रकरणी मोठा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.

बाजारभाव आणि संपादन दरातील दरीही चव्हाट्यावर

बाजारभाव आणि संपादन दरातील दरीही चव्हाट्यावर आली आहे. उलवे-नोडसारख्या भागात लाखो रुपयांचा दर असताना, संपादनासाठी मात्र कमी दर लावले जात आहेत. “सरकार जमीन स्वस्तात घेते आणि महागात विकते,” असा थेट आरोप शेतकरी शहाजी पाटील यांनी केला.

त्यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयासह सिडको आणि एमएमआरडीएकडे यासंदर्भात पत्रव्यवहारही केला आहे. यूडीसीपीआर २०२० नुसार चटईक्षेत्र निर्देशांक ०.२० वरून १.१० पर्यंत वाढल्याने जमिनीची किंमत किमान पाचपट वाढणे अपेक्षित असताना, मोबदल्यात त्याचा विचार होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा त्यांचा दावा आहे.

मुळात शासनाची ‘तिसरी मुंबई’ हा प्रकल्प भांडवलदार, बिल्डरांशी आहे. यात कोठेही रोजगार नाही, उद्योग येणार नाहीत. शेतकऱ्यांना विस्थापित करण्याचे हे कारस्थान आहे. शेतकऱ्यांना भूसंपादन कायदा २०१३ नुसार भरपाई दिली तरच लाभ होणार आहे. २२.५ टक्के योजनेत ते देशोधडीला लागतील. तेवढी जमीन त्यांना मिळतच नाही. यापूर्वीही सिडको साडेबारा टक्के योजनेत ८.३३ टक्केच  जमीन देते. नैनामध्येही सिडको ४० टक्के सांगत असली, तरी प्रत्यक्षात ३० टक्केच जमीन देते. ही शुद्ध फसवणूक आहे. - ॲड. सुरेश ठाकूर, शेतकरी नेते.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers protest 'Third Mumbai' land acquisition; 22.5% scheme sparks anger.

Web Summary : Farmers are protesting the government's 'Third Mumbai' project, opposing the 22.5% land acquisition scheme. They demand compensation as per the 2013 act, fearing displacement and inadequate returns. A major conflict looms over land rates and fair compensation.
टॅग्स :mmrdaएमएमआरडीए