शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

महापालिका क्षेत्रात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 1:40 AM

पोलिसांमार्फत गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : महानगरपालिका व सिडको नोडसमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून जनतेला वेठीस धरले जाते. याबाबत पोलिसांमार्फत गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी शिवसेना पनवेल तालुका संघटक भरत पाटील यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पनवेलसह नवी मुंबई व परिसरातील गावे पाण्यांपासून वंचित राहू नये म्हणून, महाराष्ट्र शासनाने पेण तालुक्यातील मौजे हेटवणे गावात हेटवणे धरणाची निर्मिती करून नवी मुंबई व आसपासच्या गावांना मुबलक पाणीपुरवठा देत असल्याचे चित्र सिडकोने उभे केले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने स्वत:चे मोर्वे धरण विकत घेतले आहे. त्या धरणातून नवी मुंबईसाठी पाणी पुरवठा होतो म्हणजे, सध्या होत असलेला पाणीपुरवठा हा हेटवणे धरणातून देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यातून वजा केल्यास पाण्यांची पुरवठा क्षमता अधिक राहील व कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही.

नवी मुंबई, पनवेल ग्रामीण, महानगरपालिका व सिडको परिसरात भीषण पाणीटंचाई आहे, ही वाव सायबर सिटी म्हणून नावलौकिक असलेल्या सिडकोसाठी अतिशय शरमेची असून गंभीर स्वरूपाची आहे. परंतु, पनवेल तालुक्यातील महानगरपालिका सिडको समाविष्ट नोडसमध्ये पाणीपुरवठा टॅन्कर लॉबी अतिशय प्रभावी आहे. जेणेकरून नवी मुंबईत होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ठेकेदार व प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने व्यत्यय आणून कमी दाबाने पाणीपुरवठा कसा होईल, हे पाहिले जाते. त्यानंतर टँकर लॉबी उभी राहते. सध्या सिडको प्रशासन नवीन बांधकामांना परवानगी देत आहे. खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल, उलवे येथे भीषण पाणीटंचाई दरवर्षी निर्माण होत आहे. या कृत्रिम भीषण पाणीटंचाईला सर्वस्वी टँकर लॉबी पाणीपुरवठा देखभाल करणारे ठेकेदार, प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य जबाबदार आहेत. याबाबत दुमत नाही.

जानेवारी महिन्यातच पाणीप्रश्न पेटलाnमागील वर्षी मार्च २०२० पासून कोरोना महामारीची दहशत असताना पाणीपुरवठा व्यवस्थित व मुबलक प्रमाणात उपलब्ध होत होता. त्यावेळी पाणीटंचाई निर्माण झालेली नाही. परंतु, सध्या पनवेल महानगरपालिका, सिडको नोडस व ग्रामीण परिसरात पाणीप्रश्न पेटलेला असून जानेवारी महिन्यातच भीषण पाणीटंचाईचे चित्र उभे केले जात आहे. nयाबाबत आपल्या अधिकाऱ्यांना योग्य सूचना देवून टँकर लॉबी, ठेकेदार व प्रशासनातील जबाबदार अधिकारी यांच्यावर फौजदारी केसेस दाखल करून त्या गुन्ह्यांचा तपास करून टँकर लॉबी, ठेकेदार व त्यांना मदत करणारे प्रशासनातील अधिकारी यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत भरत पाटील यांनी व्यक्त केले.