शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 15:48 IST

Priyanka Gandhi News: इस्राइलच्या हल्ल्यात गाझा ६० हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आणि त्यात १८ हजार ४३० मुलांचा समावेश असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला होता. या आरोपांवर इस्राइलकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

इस्राइल आणि हमास यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षामध्ये गाझामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.  इस्राइलच्या भयंकर हल्ल्यांमध्ये गाझापट्टी पूर्णपणे  उद्ध्वस्त झाली आहे. या संघर्षावरून काँग्रेच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी इस्राइलवर गंभीर आरोप केले होते. तसेच इस्राइलच्या हल्ल्यात ६० हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आणि त्यात १८ हजार ४३० मुलांचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला होता. प्रियंका गांधी यांच्या या आरोपांवर इस्राइलकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, तुमचं वक्तव्य लाजिरवाणं आहे. आम्ही हमासचे दहशतवादी मारले आहेत, असा दावा इस्राइलने केला आहे.

प्रियंका गांधी यांनी इस्राइलकडून गाझामध्ये सुरू असलेल्या अत्याचारांविरोधात सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून संताप व्यक्त केला. त्यात त्यांनी लिहिले की, इस्राइल गाझामध्ये नरसंहार करत आहे. यामध्ये त्यांनी ६० हजारांहून अधिक लोकांना ठार मारलं आहे. त्यात १८ हजार ४३० मुलांचाही समावेश आहे. शेकडो लोकांना उपासमारीने मरण्यासाठी सोडण्यात आलं आहे. त्यात अनेक मुलांचाही समावेश आहे. आता लाखो लोकांना उपाशी मारण्याची धमकी दिली जात आहे.

त्यांनी पुढे लिहिले की, या गुन्ह्यांना मौन बाळगून आणि डोळेझाक करून प्रोत्साहन देणं हाही एक गुन्हाच आहे. या सर्व प्रकाराबाबत भारत सरकार मौन बाळगून आहे. तर इस्राइल पॅलेस्टाइनच्या नागरिकां सातत्यावन उद्ध्वस्त करत आहे.

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी केलेल्या या आरोपांना इस्राइलचे भारतामधील राजदूत रेवुएन अजार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, तुम्ही करत असलेली चुकीची विधानं लाजिरवाणी आहेत. इइस्राइलने आतापर्यंत हमासच्या २६ हजार दहशतवाद्यांना मारलं आहे. तसेच यादरम्यान, मानवी जीवनाला झालेलं नुकसान हे हमासच्या गलिच्छ रणनीतीचा परिपाक आहे. हमासचे दहशतवादी सर्वसामान्य नागरिकांचा ढालीसारखा वापर करून त्यांच्यामागे लपत आहेत. तसेच मदत आणि बचावकार्य करणाऱ्यांवर गोळीबार कऱणे, रॉकेट डागणे असली कृत्ये करत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

रेवुएन अजार पुढे म्हणाले की, इस्राइलने गाझामध्ये २० लाख टन अन्नपदार्थ पाठवले. मात्र हमासने ते जप्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उपासमारीची स्थिती निर्मा झाली. गाझाची लोकसंख्या मागच्या ५० वर्षांमध्ये ४५० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे तिथे नरसंहाराचा कुठलाही प्रश्नच निर्माण होत नाही, असा दावाही त्यांनी केला.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsraelइस्रायल