शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायद्यावरून बळीराजा का रागावला? जाणून घ्या, दिल्लीतील आंदोलनामागची पार्श्वभूमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 07:25 IST

कायदे शेतकरी हिताचे की अहिताचे?

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणेचा सातत्याने पुनरुच्चार करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने नुकत्याच झालेल्या संसद अधिवेशनात शेतकऱ्यांच्या हिताचे तीन विधेयके मंजूर करत त्यांचे कायद्यात रुपांतर केले. मात्र, हे तीनही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत, असे बळीराजाचे म्हणणे आहे. म्हणूनच या कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन आयोजित करण्यात आले होते. कायदे शेतकरी हिताचे की अहिताचे, ही चर्चा त्यानिमित्ताने सुरू झाली आहे. काय आहेत हे कायदे? बळीराजा का रागावला आहे? पाहू या...

कृषी उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सरळीकरण) कायदा  या कायद्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची वा धान्याची खुली विक्री करण्याचे स्वातंत्र्यम्हणजे त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विक्रीसाठी नेण्याची गरज नाहीविपणन आणि वाहतूक खर्चात बचत होणारराज्यांतर्गत तसेच दोन राज्यांत शेतीविषयक व्यापार वाढीस लागणार

शेतकऱ्यांचा आक्षेप१. पिकांची आधारभूत किंमत पद्धत लयाला जाईल.२. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येईल.३. ‘ई-नाम’सारख्या सरकारी पोर्टल्सचे काय होईल?सरकारचा दावा १. आधारभूत किंमत पद्धत पूर्वीसारखीच चालू राहणार.२. बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येणार नाही.३. शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध होईल ४. ई-नाम सुरूच राहणार

जीवनावश्यक वस्तू कायदा धान्य, डाळी, तेलबिया, खाद्य तेल, कांदा-बटाटा यांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून हटविणारशेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची योग्य किंमत मिळेल आणि बाजारात स्पर्धा वाढेल

शेतकऱ्यांचा आक्षेप१. मोठ्या कंपन्या जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करतील२. त्यामुळे काळाबाजार वाढेल

सरकारचा दावा १. पिकांच्या नासाडीची चिंता मिटेल२. कांदा-बटाट्याचे उत्पादन शेतकरी बिनधास्त करू शकतील३. कांदा-बटाट्याच्या किमतींबाबत शेतकरी निश्चिंत राहतील

पिकांच्या किमतींबाबत आश्वासन आणि कृषिसेवा करार कायदा  शेतीविषयक कंत्राट-करारांसंदर्भातील राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांची तरतूदशेतमालाची विक्री, शेतीविषयक अन्य सेवा, कृषीउद्योगातील संस्था, घाऊक व किरकोळ विक्रेते आणि निर्यातदार शेतकऱ्यांशी संलग्न होणारशेतकऱ्यांना सर्वोत्तम बियाण्याचा पुरवठा, पिकांच्या आरोग्याची सातत्याने पाहणीकर्जाची सुविधा आणि पीक विमा योजना

शेतकऱ्यांचा आक्षेप१. कंत्राटीपद्धतीमुळे शेतकऱ्यांची बाजू लंगडी होईल.२. पिकांच्या किमती शेतकरी ठरवू शकणार नाहीत३. लहान शेतकरी कंत्राटी शेती करू शकणार नाहीत४. मोठ्या कंपन्यांनाच फायदा जास्त होईल

सरकारचा दावा १. कंत्राटी शेती करावी की नाही, हे ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना२. पिकांची किंमत ठरविण्याचे अधिकारही शेतकऱ्यांकडेच राहणार३. देशात १० हजार फार्म प्रोड्युसर ग्रुप्स तयार केले जाणार४. या ग्रुप्सच्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांचे संघटन होणार५. त्यातून पिकांच्या किंमत निश्चितीबाबतचे धोरण ठरणार

टॅग्स :FarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार