शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

UIDAIची 127 आधार धारकांना नोटीस, उद्यापर्यंत सिद्ध करावं लागणार नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 8:55 AM

ज्या लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यातील जास्त करून लोक मुस्लिम समुदायाचे आहेत.

ठळक मुद्देहैदराबाद कार्यालयानं मंगळवारी कथित आणि चुकीच्या पद्धतीनं आधार क्रमांक मिळवणाऱ्या 127 जणांना नोटीस पाठवली आहे. ज्या लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यातील जास्त करून लोक मुस्लिम समुदायाचे आहेत.  UIDAIने 3 फेब्रुवारीला दिलेल्या नोटिशीत लिहिलं आहे की, हैदराबादेतल्या प्रादेशिक कार्यालयाला एक तक्रार मिळाली.

नवी दिल्लीः भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा(UIDAI)च्या हैदराबाद कार्यालयानं मंगळवारी कथित आणि चुकीच्या पद्धतीनं आधार क्रमांक मिळवणाऱ्या 127 जणांना नोटीस पाठवली आहे. UIDAIच्या मते, त्यांना भारताचं नागरिकत्व सिद्ध करावं लागणार आहे. ज्या लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यातील जास्त करून लोक मुस्लिम समुदायाचे आहेत. UIDAIने 3 फेब्रुवारीला दिलेल्या नोटिशीत लिहिलं आहे की, हैदराबादेतल्या प्रादेशिक कार्यालयाला एक तक्रार मिळाली. त्यामुळे त्या संबंधित व्यक्तींना भारताचं नागरिकत्व सिद्ध करावं लागणार आहे. त्यांनी चुकीची माहिती देऊन खोटी कागदपत्रं दाखवून आधार नंबर मिळवला आहे, असाही त्यात उल्लेख आहे. आता त्या लोकांना आपलं नागरिकत्व प्रमाणित करावं लागणार आहे.   

  • 20 फेब्रुवारीला सादर होण्याचे निर्देश 

हैदराबाद प्रादेशिक कार्यालयाकडून बर्‍याच वर्षांपासून या प्रकरणाची तपासणी केली जात आहे. या संबंधांत सर्व 127 लोकांना 20 फेब्रुवारीला इन्क्वॉयरी ऑफिसर अमिता बिंदरू यांच्या समोर खरे दस्तावेज दाखवून नागरिकत्व सिद्ध करावं लागणार आहे. जर त्यांनी नागरिकत्व सिद्ध केलं नाही, तर त्यांचं आधार कार्ड निष्क्रिय करण्यात येणार आहे. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणती कागदपत्रं द्यावी लागणार आहेत हे नोटिशीमध्ये सांगण्यात आलं आहे. 

  • रिक्षाचालकाचं आधार खोटं असल्याची तक्रार

हैदराबादेतल्या 40 वर्षीय ऑटो-रिक्षाचालकाला UIDAIनं एका तक्रारीनंतर नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगितलं आहे. तक्रारीत त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड असल्याचं सांगण्यात येत आहे. बायोमेट्रिक्स-आधारित ओळखपत्र प्रणाली चालवणाऱ्या प्राधिकरणाच्या उपसंचालक आणि तपास अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकाला 20 फेब्रुवारीच्या सकाळी 11 वाजता त्यांच्यासमोर उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.     

  • काय आहे आधार अ‍ॅक्ट?

आधार अ‍ॅक्ट 2016नुसार, आधार हा एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व सिद्ध करतो. आधार अधिनियमांतर्गत  UIDAIला आधार कार्ड वितरीत करायचं की नाही हे ठरवावं लागणार आहे. एखाद्या व्यक्तीचा अर्ज आल्यानंतर भारतात कमीत कमीत 182 दिवस ती व्यक्ती वास्तव्याला असली पाहिजे. तरच त्याला आधार कार्ड देण्यात येते.  

  • सर्वोच्च न्यायालयानं दिले निर्देश 

सर्वोच्च न्यायालयानं आपल्या ऐतिहासिक निर्णयात यूआयडीएआय (UIDAI)ला अवैध प्रवाशांना आधार कार्ड जारी न करण्याचे निर्देश दिले आहेत.