शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:24 IST

Rajnath Singh Speech on Operation Sindoor: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरबद्दल सरकारच्या वतीने भूमिका मांडली. 

Rajnath Singh Speech on Pahalgam: "मी चार दशकांपेक्षा जास्त काळापासून राजकारणात आहे. कधीही राजकारणाकडे शत्रूत्वाच्या नजरेने बघितले नाही. आज आम्ही सत्तेत आहोत, तर असे नाहीये की नेहमीच सत्तेत राहू. जनतेने जेव्हा आमच्यावर विरोधी पक्षाची जबाबदारी सोपवली, तेव्हा आम्ही ती सकारात्मक पद्धतीने पार पाडली", अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना लोकसभेत सुनावले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत सोमवारपासून चर्चा सुरू झाली. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेची सुरूवात करत ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती दिली. 

"जेव्हा लक्ष्य मोठे असते, तेव्हा..."

लोकसभेत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, "विरोध पक्षाचे लोक विचारत आहेत की, आपले किती लढाऊ विमाने पाडली गेली. हा प्रश्न जनभावनेचं योग्य पद्धतीने प्रतिनिधित्व करत नाही. त्यांना विचारायचंच असेल, तर त्यांनी आम्हाला विचारावं की, भारतीय लष्कराने शत्रूंची किती विमाने पाडले? त्यांनी प्रश्न विचारावा की, ऑपरेशन सिंदूर  यशस्वी झाले आहे का? तर उतर आहे, हो", असे उत्तर राजनाथ सिंह यांनी विरोधकांना दिले. 

"जेव्हा लक्ष्य मोठे असते, तेव्हा छोट्या मुद्द्यांकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. त्यामुळे देशाची सुरक्षा, लष्कराच्या जवानांच्या सन्मान आणि उत्साहावरून लक्ष विचलित होऊ शकतं. विरोधी पक्ष ऑपरेशन सिंदूरबद्दल व्यवस्थित प्रश्न विचारत नाहीये, त्यामुळे काय उत्तर देऊ?", असे राजनाथ सिंह म्हणाले. 

"आम्ही कायमच सत्तेत राहू असे नाही" 

राजनाथ सिंह म्हणाले, "मी चार दशकांपेक्षा जास्त काळापासून राजकारणात आहे. कधीच राजकारणाकडे शत्रूत्वाच्या नजरेने बघितले नाही. आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही. जनतेने आमच्यावर जेव्हा विरोधी पक्षाची जबाबदारी सोपवली आणि आम्ही ती सकारात्मक पद्धतीने निभावली. आम्ही १९६२ मध्ये चीनसोबतच्या युद्धात वाईट परिणाम आला. तेव्हा आम्ही विचारले की दुसऱ्या देशाने आपल्या भूमीवर ताबा कसा मिळवला? आम्ही विचारलं की, जवान शहीद कसे झाले? आम्ही मशीन आणि तोफाची काळजी न करता देशाच्या भल्याचा विचार केला."

"१९७१ जेव्हा आपण पाकिस्तानला धडा शिकवला. आम्ही राजकीय आणि लष्करी नेतृत्वाचे कौतुक केले. अटल बिहारी वाजपेयी संसदेत उभे राहून त्यावेळच्या राजकीय नेतृत्वाचे कौतुक केले होते. आम्ही त्यावेळीही असे प्रश्न विचारले नाही. हाच मुद्दा आणि वास्तविक स्वरुपात सांगायचं झालं, तर परीक्षेत निकालच महत्त्वाचा असतो", असे उत्तर राजनाथ सिंह यांनी विरोधकांना दिले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन