शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

"ओडिशा अपघातातील पीडितांसाठी माझे १० कोटींचे दान स्वीकारा", सुकेशचे रेल्वेमंत्र्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 7:19 PM

Odisha Train Tragedy : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात २९० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

नवी दिल्ली : ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातानं अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं. २९० नागरिकांना या भीषण अपघातात आपला जीव गमवावा लागला. या अपघातातील पीडितांच्या मदतीसाठी अनेकजण समोर येत आहेत. अशातच दिल्लीच्या मंडोली तुरुंगात बंद असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर याने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून ओडिशा रेल्वे अपघातातील पीडितांसाठी १० कोटी रुपयांचे दान स्वीकारण्याची विनंती केली आहे. 

२ जून रोजी झालेल्या अपघातात २९० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. शुक्रवारी लिहिलेल्या पत्रात सुकेशने म्हटले की, हे योगदान माझ्या वैयक्तिक निधीतून देत आहे, जे माझ्या कमाईच्या स्रोतातून आले आहे. १० कोटी रुपयांच्या डिमांड ड्राफ्टसोबत रिटर्न फायलिंग आणि इतर कागदपत्रेही दिली जातील. सुकेशने आपल्या वकिलामार्फत जारी केलेल्या पत्रात लिहिले, "हा एक दुर्दैवी अपघात असून त्यामुळे मी पूर्णपणे तुटलो आहे. मागील काही दिवसांपासून या घटनेने मी व्यथित आहे. या दुर्घटनेत ज्यांच्या जवळच्या व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत क्लेशदायक आहे."

सुकेशचे रेल्वेमंत्र्यांना आवाहन तसेच आपले सरकार सर्व बाधितांना सर्व आवश्यक गोष्टी पुरवत आहेच पण मी एक जबाबदार आणि चांगला नागरिक म्हणून ज्या कुटुंबांनी आपले कमावते प्रियजन गमावले आहेत. त्यांच्यासाठी आर्थिक मदत करू इच्छित आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मी १० कोटी रुपयांचे योगदान देत आहे. हे योगदान केवळ मृत कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी वापरले जावे, असे सुकेशने पत्रात लिहले.

२९० जण दगावले२ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता बालासोर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला. या अपघातात २९० जणांचा मृत्यू झाला तर १२०० हून अधिक जण जखमी झाले होते. अवघ्या विश्वाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या रेल्वे अपघातात तब्बल २९० जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या दुर्देवी घटनेनंतर ३ जून रोजी ओडिशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.  

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातDeathमृत्यूAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवrailwayरेल्वे