शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

"काही जण देताहेत दलालांना साथ, शेतकऱ्यांनो सावध राहा", मोदींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 15:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत पारीत झालेल्या शेतीसंबंधीच्या तीन विधेयकांना विरोध करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

ठळक मुद्देकाही लोक दलालांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेतशेतीसंबंधीच्या या विधेयकांमुळे शेतकरी सर्व बंधनातून मुक्त होऊन स्वत:चे पीक स्वत: विकून कमाई वाढवू शकेलही विधेयके शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना दलालांपासून वाचवण्यासाठी आणण्यात आली आहेत

नवी दिल्ली - केंद्र सरकारने काल लोकसभेमध्ये पारित करून घेतलेल्या शेतीसंबंधीच्या तीन विधेयकांमुळे सध्या वातावरण तापले असून, या विधेयकांना तीव्र विरोध होत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपाचा जुना मित्रपक्ष असलेल्या अकाली दलानेही या विधेयकांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विधेयकांना विरोध करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. काही लोक दलालांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला मोदींनी लगावला आहे. तसेच या विधेयकांमुळे शेतकरी सर्व बंधनातून मुक्त होऊन स्वत:चे पीक स्वत: विकून कमाई वाढवू शकेल. शेतकऱ्यांसाठी आधी जेवढे काम झाले नाही तेवढे काम गेल्या ६ वर्षांत झाले आहे, असा दावा मोदींनी केला आहे.

आज बिहारमध्ये एका पुलासह १२ रेल्वे योजनांचे उदघाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विश्वकर्मा दिनाच्या मुहुर्तावर शेतीसंबंधीची तीन विधेयके लोकसभेत पारित झाली आहेत. या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी अधिकचे पर्याय उपलब्ध होतीत. ही विधेयके पारित झाल्याबद्दल मी देशातील शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो. ही विधेयके शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना दलालांपासून वाचवण्यासाठी आणण्यात आली आहेत,

काही लोक अनेक दशके देशाच्या सत्तेत राहिले. त्यांनी देशावर राज्य केले. तेच लोक आज या विषयावरून शेतकऱ्याच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना खोटेनाटे सांगत आहेत. निवडणुकांच्या वेळी हे लोक शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने देत होते. आपल्या जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा करत होते. मात्र निवडणुका झाल्यावर सर्व काही विसरत होते. आता त्याच गोष्ठींची पूर्तता एनडीएचे सरकार करत आहे. तर या मंडळींडून तऱ्हेतऱ्हेच्या अफवा पसरवत आहेत, असा आरोप मोदींनी केला.

ज्या एपीएमसी कायद्यावरून हे लोक राजकारण करत आहेत. कृषी बाजारपेठेबाबतच्या तरतुदींमधील बदलांना विरोध करत आहेत. त्याच बदलांचे आश्वासन या मंडळींना आपल्या जाहीरनाम्यामधून दिले होते. मात्र आता एनडीएच्या सरकारने हे बदल केले तर यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. आता शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत दिली जाणार नाही, शेतकऱ्यांकडून भात, गहू खरेदी केली जाणार नाही, असा दावा केला जात आहे. हे पूर्णपणे खोटे आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांना किमान हमीभावाच्या माध्यमातून योग्य मूल्य देण्यासाठी कटीबद्ध आहे, तसेच सरकारकडून खरेदी पूर्वीप्रमाणेच सुरू राहील, असे मोदींनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीagricultureशेतीFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार