शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 10:51 IST

Rahul Gandhi Attacks on BJP: नुकत्याच चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालावर शंका उपस्थित करत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि भाजपावर हल्ला चढवला. 

"भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने जागा चोरल्या आहेत", याच विधानाचा पुन्हा उल्लेख करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर टीका केली. निवडणूक प्रक्रियेबद्दल अनेक शंका उपस्थित करत लोकसभा निवडणुकीतही भाजपाचा प्रत्येक सहावा खासदार हा मतांची चोरी करून जिंकून आणलेला आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.

विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. लोकसभा निवडणूक आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, "कधी मतांची चोरी करून जागा चोरल्या जातात, तर कधी पूर्ण सरकारच चोरले जाते. (भाजपाच्या) लोकसभेच्या २४० खासदारांपैकी प्रत्येक सहावा खासदार हा मतांची चोरी करून जिंकलेला आहे. त्यांना ओळखणे कठीण नाहीये, पण त्यांना भाजपाच्या भाषेत घुसखोर म्हणायचे का?", असा सवाल राहुल गांधींनी केला आहे.

भाजपाला १४० जागाही जिंकता येणार नाहीत 

राहुल गांधी पुढे म्हणाले, "आणि हरयाणात? तिथे तर पूर्ण सरकारच घुसखोर आहे. जे संस्था आपल्या खिशात ठेवतात. जे मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियाच उलट सुलट करून ठेवतात. ते स्वतःच रिमोट कंट्रोलवर आहेत. त्यांना सत्याची भीती वाटते. कारण निष्पक्ष निवडणुका झाल्या, तर आज ते (भाजपा) १४० जागाही जिंकू शकत नाहीत", अशी टीका राहुल गांधींनी केली.

 

पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल विरोधकांना शंका

निकाल समोर आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदा निवडणूक आयोगावर आरोप केले. भाजपाने १०० जागा चोरल्याचा आरोप ममतांनी केला. त्यानंतर इंडिया आघाडीतील इतर पक्षांच्या नेत्यांकडूनही निकालाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

महाराष्ट्र, हरयाणा, दिल्ली या राज्याच्या निवडणूक निकालाचे हवाले दिले जात आहेत. राहुल गांधींनीही याच मुद्द्यावरुन आता केंद्र सरकार आणि भाजपाला लक्ष्य केले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi Slams BJP, Claims Electoral Malpractice, Predicts Poor Performance.

Web Summary : Rahul Gandhi accuses BJP of stealing votes with the Election Commission's help. He alleges electoral malpractices in Lok Sabha and Haryana elections, stating BJP might struggle to win even 140 seats in fair elections. Other opposition leaders are questioning election results, too.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसAssembly Electionविधानसभा निवडणूक २०२६