शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल व्हॅनवर रेल्वे धडकून सहा ठार

By admin | Updated: December 5, 2014 01:59 IST

महासो या गावाजवळील मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवरून ही स्कूल व्हॅन जात असताना आजमगडहून वाराणसीला जाणारी तमसा पॅसेंजर गाडी व्हॅनवर धडकली.

मऊ : उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात गुरुवारी सकाळी एका मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल व्हॅन व रेल्वेची धडक होऊन सहा शाळकरी बालके ठार, तर नऊ जखमी झाली. ठार झालेल्या मुलांचे वय अवघे ४ ते ५ वर्षांचे होते. हा अपघात वाहनचालकाच्या बेजबाबदारपणामुळे घडल्याचे पोलिसांनी सांगितले. महासो या गावाजवळील मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवरून ही स्कूल व्हॅन जात असताना आजमगडहून वाराणसीला जाणारी तमसा पॅसेंजर गाडी व्हॅनवर धडकली. या धडकेने व्हॅनच्या चिंधड्या उडाल्या. या भीषण अपघातात पाच मुले जागीच ठार झाली, तर एकाचे रुग्णालयात निधन झाले. ही सर्व मुले हाजीपूरच्या डीडी कॉन्व्हेंट स्कूलमधील विद्यार्थी होते. ठार झालेल्या मुलांपैकी चौघांची ओळख पटली असून त्यांची नावे शिवम्, सुंदरम् व आयुष, कृष्णा अशी आहेत. दोन मुलांची अद्याप ओळख पटलेली नाही. या व्हॅनमध्ये १५ मुले होती, असे पोलिसांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)