शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 15:23 IST

Shashi Tharoor On India-Pakistan Ceasefire: युद्धविरामबाबत शशी थरुर यांनी काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतली असून, सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

Shashi Tharoor On India-Pakistan Ceasefire: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम झाल्यामुळे अनेक विरोधी नेते सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेस नेते तर 1971चे युद्ध आणि आताच्या संघर्षाची तुलना करत माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा मुद्दा उपस्थित करत आहेत. या दरम्यान काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी मात्र संतुलित भूमिका घेतली आहे. 

1971 आणि आताची परिस्थिती वेगळीमीडियाशी संवाद साधताना शशी थरुर म्हणाले की, '1971 आणि 2025 ची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. सध्या भारतासाठी शांतता आणि स्थैर्य हे प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे. यावेळी भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी कारवाई केली होती, जी आता पूर्ण झाली आहे. आता उगीच युद्ध चालू ठेवण्यात अर्थ नाही. भारताने आपल्या आर्थिक प्रगतीवर आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करावे आणि दीर्घकालीन युद्धात अडकू नये.'

थरुर पुढे म्हणतात, '1971 च्या युद्धाचे एक नैतिक उद्दिष्ट होते. ते युद्ध बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढले गेले होते. त्यावेळी भारत नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता. आज परिस्थिती वेगळी आहे. पाकिस्तानची लष्करी भूमिका, तांत्रिक क्षमता आणि धोरणात्मक विचारसरणी बदलली आहे. आता पाकिस्तानसोबत दीर्घकाळ युद्ध सुरू ठेवले, तर दोन्ही बाजूने मोठी जीवित आणि वित्तहानी होईल. आजच्या भारताला फक्त सूड हवा नाही तर स्थिरता हवी आहे,' असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाShashi Tharoorशशी थरूरBJPभाजपाcongressकाँग्रेस