शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

केंद्र सरकारच्या सहकार्याने संत रविदास मंदिर उभारण्यात राज्य सरकार आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 1:32 AM

केंद्राच्या मदतीने राज्य सरकार हे मंदिर उभारेल, अशी भूमिका घेत नुकतेच केजरीवालांनी केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीपसिंह पूरी यांना पत्र पाठवले.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या मदतीने संत रविदासांचे मंदिर नव्याने उभारण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. मंदिर उभारण्यात अडसर ठरणारी वन विभागाची ‘वादग्रस्त जमीन’ विमुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी यानिमित्ताने केली. वन परिक्षेत्रात असलेली ही जमीन दिल्ली विकास प्राधिकरणाच्या (डीडीए) अखत्यारित आहे. केंद्र सरकारच त्यामुळे यासंबंधी निर्णय घेवू शकते. राज्य सरकारतर्फे दिल्ली विकास प्राधिकरणाला केंद्रीय वन मंत्रालयाकडे जमीन विमुक्त करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा लागेल, असे मत केजरीवालांनी व्यक्त केले.

केंद्राच्या मदतीने राज्य सरकार हे मंदिर उभारेल, अशी भूमिका घेत नुकतेच केजरीवालांनी केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीपसिंह पूरी यांना पत्र पाठवले. पत्रातून त्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. १० आॅगस्ट ला डीडीए ने भाविकांच्या भावनांचा विचार न करता हे मंदिर पाडले होते.

संत रविदासांच्या अनुयायांनी त्यानंतर दिल्लीसह इतर राज्यात आंदोलन पुकारले. केवळ दलित समाजासाठी नाही, तर सर्व समाजासाठी संत रविदास श्रद्धेय आहेत. गेल्या पाच शतकांपासून रविदासांचे विचार अनेक पिढ्यांना सशक्त बनवत आहे, असे केजरीवाल म्हणाले.जमीन विमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. मंदिराच्या सोसायटीला केंद्र सरकाराकडून जमीन उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांच्या सहकार्याने मंदिर बांधण्यात आनंद होईल, अशी भावना के जरीवालांनी व्यक्त केले.दिल्ली विकास प्राधिकरणाची या जमिनीवर मालकी आहे. त्यामुळे जमीन मोकळी करण्याचा प्रस्ताव डीडीएला सादर करावा लागेल. राज्य सरकारच्या वन विभागाकडे हा प्रस्ताव येताच तो तत्काळ मंजुरीसाठी केंद्रीय वन मंत्रालयाकडे पाठवला जाईल. संपूर्ण प्रक्रिया होण्यासाठी जवळपास आठवडा लागेल. - राजेंद्र पाल गौतम, सामाजिक न्याय मंत्री, राज्य सरकार

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल