शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करायला हवी; गुजरातमध्ये राकेश टिकैत यांची महापंचायत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 08:46 IST

rakesh tikait in gujarat: राजस्थानच्या अबू रोड येथून राकेश टिकैत गुजरातमध्ये दाखल झाले.

ठळक मुद्देराकेश टिकैत यांचा गुजरात दौराराजस्थानमधून टिकैत गुजरातमध्ये दाखलपालमपूर येथे किसान महापंचायतीला केले संबोधित

पालमपूर: वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. तर, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत देशातील विविध राज्यांमध्ये दौरे करत शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. रविवारी राजस्थानच्या अबू रोड येथून राकेश टिकैतगुजरातमध्ये दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर व्हायला हवी, असे टिकैत म्हणाले. (rakesh tikait on gujarat visit)

राकेश टिकैत यांनी बनासकांठा येथील पालमपूरमध्ये किसान महापंचायतीला संबोधित केले. यावेळी टिकैत यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकारी शंकर सिंह वाघेला उपस्थित होते. येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करायला हवी, असे टिकैत म्हणाले. 

१०० वेळा हल्ले झाले, तरी आंदोलन, महापंचायत थांबणार नाही; राकेश टिकैत यांचा एल्गार

आंदोलनात कसे सहभागी व्हायचे हे तुम्ही ठरवा

गुजरातमधील शेतकऱ्यांनी आंदोलनात कसे सहभागी व्हायचे, हे तुम्हीच ठरवायला हवे. युवकांनी, तरुण वर्गाने अधिकाधिक संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी व्हायला हवे, असा पुनरुच्चार राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना केला. केंद्र सरकार संपूर्ण देशात गुजरात मॉडेल लागू करू इच्छिते, अशी टीका करत रिलायन्सला ६० गावे देऊन टाकली. तसेच देशभरातील शेतकऱ्यांची जमीन कंपनी, व्यवसायिकांना देऊन टाकण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा दावा टिकैत यांनी केला. 

सरकार शेतकऱ्याच्या विरोधात

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून, त्यांचे केवळ शोषण सुरू आहे. सरकारच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी नाहीत, असा आरोप टिकैत यांनी केला. गुजरातमध्ये प्रवेश करताना कोरोना रिपोर्टबाबत विचारले असता, ते टिकैत म्हणाले की, त्यांच्याकडे सर्व प्रकारची कागदपत्रे आहेत. आपला पासपोर्ट दाखवत, आता गुजरातमध्ये प्रवेश करण्यासाठी याची आवश्यकता आहे का, असा खोचक टोला टिकैत यांनी लगावला. 

दरम्यान, १०० वेळा हल्ले झाले, तरी नियोजित कार्यक्रमात कोणताही बदल करणार नाही. महापंचायत थांबणार नाही, त्या होतच राहणार, एवढेच नाही तर, शेतकरी आंदोलनही थांबणार नाही, असा एल्गार टिकैत यांनी केला. कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या गाझिपूर, सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी गेल्या गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांकडून तिन्ही कायद्यांना कडाडून विरोध केला जात आहे. 
 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनGujaratगुजरात