शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला धक्का; २३ पालिका काँग्रेसच्या 'हाता'त, राजस्थानातून ओसरली 'मोदी लाट'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 16:14 IST

'मोदी तुझ से बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं' असा निर्धार राजस्थानातील जनतेनं विधानसभा निवडणुकीआधी केला होता.

ठळक मुद्देराजस्थानच्या शहरी मतदारांनी 'कमळा'ला नाकारल्याचं समोर आलं आहे.डिसेंबर २०१८ मध्ये जाहीर झालेल्या राजस्थान विधानसभेच्या निकालात भाजपाला सत्ता गमवावी लागली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला ४९ पैकी फक्त सहा ठिकाणी विजय मिळाला आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्यानं भाजपाच्या गोटात अस्वस्थता आणि नाराजी असतानाच, राजस्थानच्या शहरी मतदारांनीही 'कमळा'ला नाकारल्याचं समोर आलं आहे. २ महापालिका, ३० नगरपालिका आणि १७ नगरपरिषदा अशा एकूण ४९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसनं २३ ठिकाणी आपला झेंडा फडकवला आहे, तर भाजपाला फक्त सहा ठिकाणी विजय मिळाला आहे. २० जागांवर अन्य पक्ष आणि अपक्षांनी बाजी मारली आहे. ही कामगिरी पक्षनेतृत्वाच्या चिंता वाढवणारीच मानली जातेय. 

'मोदी तुझ से बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं' असा निर्धार राजस्थानातील जनतेनं विधानसभा निवडणुकीआधी केला होता. त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला. डिसेंबर २०१८ मध्ये जाहीर झालेल्या राजस्थान विधानसभेच्या निकालात भाजपाला सत्ता गमवावी लागली. वसुंधरा राजेंचं राज खालसा झालं आणि काँग्रेसला 'अच्छे दिन' आले. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानातील सर्वच्या सर्व २५ जागांवर 'कमळ' फुललं होतं.

लोकसभेवेळी उसळलेली मोदी लाट राजस्थानातून पुन्हा एकदा ओसरल्याचं चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळालं. भरतपूर आणि बीकानेर महापालिकांमध्ये भाजपा मोठा पक्ष ठरला असला, तरी नगरपालिका/नगरपरिषदांमध्ये त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. निवडणुकीआधी या ४९ पैकी २१ ठिकाणी भाजपाची सत्ता होती. ती आता सहावर आली आहे. याउलट, काँग्रेसच्या खात्यात दोन पालिका वाढल्या असून ते २३ वर पोहोचलेत. तब्बल २० ठिकाणी अपक्ष उमेदवारांच्या हाती सत्तेची किल्ली असणार आहे. 

१६ नोव्हेंबरला या ४९ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान झालं होतं. अयोध्या प्रकरणाचा निकाल या ठिकाणी भाजपाला फायदेशीर ठरणार का, याबद्दल उत्सुकता होती. परंतु, स्थानिक मुद्द्यांच्या आधारेच मतदारांनी मतदान केल्याचं निकालातून स्पष्ट होतं. त्यामुळे येत्या काळात भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाला आत्मपरीक्षण करावं लागणार आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेस