शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: 'याला कोण चांगले दिवस म्हणतं?', राहुल गांधींचा आंदोलक तरुणांना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 19:31 IST

राहुल गांधींनी रेल्वे भर्ती बोर्ड-एनटीपीसी परीक्षेत झालेल्या गोंधळाविरोधात आंदोलन करत असलेल्या तरुणांना पाठिंबा दिला आणि सरकारवर निशाणा साधला.

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी शुक्रवारी रेल्वे भरती बोर्ड-एनटीपीसी परीक्षेच्या (RRB NTPC Exam)  नियम आणि निकालाविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणांना पाठिंबा देत सरकारवर निशाणा साधला. 'याला चांगले दिवस कोण म्हणतो?', असा सवाल त्यांनी केला. 

राहुल गांधींनी एका तरुणाचा व्हिडिओ शेअर करत ट्विट केले की, 'विद्यार्थी बरोबर आहेत. त्यांची वेदना खरी आहे. कोण म्हणतं आजचे दिवस चांगले आहेत?" राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण म्हणतोय की, माझ्या महिन्याचा खर्च पाठवण्यासाठी त्याची आई आजारी असतानाही तिचे औषध घेत नाहीये. दरम्यान, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये आंदोलक तरुणांवर पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत काँग्रेस युवा आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

गुन्हे परत घेण्याची काँग्रेसची मागणीयावेळी भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी आरोप केला की, "नरेंद्र मोदी सरकार तरुणांवर केवळ नोकऱ्यांची मागणी करत असल्याने त्यांच्यावर अत्याचार करत आहे. सरकारने हे समजून घेतले पाहिजे की ते लाठीमार करून तरुणांचा आवाज दाबू शकत नाहीत. सरकारने विद्यार्थ्यांवरील खटले मागे घ्यावेत आणि संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

परीक्षा पुढे ढकलल्यादेशातील विविध भागांत झालेल्या आंदोलनानंतर रेल्वे मंत्रालयाने बुधवारी नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (RRB-NTPC) आणि लेव्हल 2 च्या परीक्षा पुढे ढकलल्या. परीक्षा दोन टप्प्यात घेण्याच्या रेल्वेच्या निर्णयाला उमेदवारांकडून विरोध होत आहे. त्यांचे म्हणणे आहे की अंतिम निवडीचा दुसरा टप्पा म्हणजे संगणक आधारित चाचणी (CBT) साठी RRB-NTPC च्या पहिल्या टप्प्यात उपस्थित आणि पात्र ठरलेल्यांची फसवणूक करण्यासारखे आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीrailwayरेल्वेcongressकाँग्रेस