शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

टाळी-थाळी, उत्सव खूप झालं, आता देशाला आधी लस द्या; राहुल गांधी कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 7:15 PM

Corona Vaccination: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लस महोत्सवावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोलकोरोना लसीकरणावरून साधला निशाणाकेंद्राच्या अपयशामुळे कोरोनाची दुसरी लाट - राहुल गांधी

नवी दिल्ली: महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाने हाहाःकार केला असून, गेल्या काही सलग दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येने १.२५ लाखांचा टप्पा ओलांडल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला कोरोना लसींचा (Corona Vaccination) तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी अनेक राज्यांमधून केल्या जात आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लस महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. टाळी-थाळी, उत्सव खूप झाले, आता देशाला लस द्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. (rahul gandhi says first of all modi govt should give corona vaccine to all state)

राहुल गांधी यांनी एक ट्विट करत पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदाल हल्लाबोल केला. गेल्या ३८५ दिवसांत कोरोनाविरुद्धची लढाई जिंकता आलेली नाही. उत्सव, टाळी-थाळी खूप झाले, आता देशाला लस द्या, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. या ट्विटसह राहुल गांधी यांनी देशातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करणारा व्हिडिओ शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

दुसरी लाट आहे आणि लाखो कोरोना बळी

कोरोना विरोधातील लढाई १८ दिवसांत जिंकली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. पंतप्रधान मोदींनी टाळ्या आणि थाळ्या वाजवून घेतल्या, मोबाइल लाइटही लावायला लावला. मात्र, कोरोना वाढतच गेला. आता दुसरी लाट आहे आणि लाखो जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. तुम्ही इव्हेंटबाजी कमी करा, ज्या कुणाला लसीची आवश्यकता आहे त्याला ती मिळवून द्या. लसीची निर्यात बंद करा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. 

कुराणसंदर्भातील 'ती' याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; याचिकाकर्त्याला ५० हजारांचा दंड

केंद्राच्या अपयशामुळे कोरोनाची दुसरी लाट

केंद्र सरकारच्या अपयशामुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यापूर्वी केला. स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसमान्यांचे जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणे आवश्यक आहे. मात्र, अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी  आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला होता. 

“राज्यातील सर्व मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल”

दरम्यान, कोरोनाचा फैलाव युद्धपातळीवर रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले होते. अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले होते.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा