शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

आंदोलक शेतकऱ्यांना हरयाणा सीमेवर अडवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 8:07 AM

पोलिसांकडून पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर;  राहुल गांधी, अमरिंदर सिंग, केजरीवालांकडून कारवाईचा निषेध

चंदीगढ : केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात गुरुवारी ‘चलो दिल्ली’आंदोलनात सहभागी झालेल्या पंजाबमधील शेतकऱ्यांना हरयाणाच्या सीमेवर अडवण्यात आले. त्यांना पाण्याच्या फवाऱ्यांना तोंड द्यावे लागले. नंतर शेतकऱ्यांनी पोलिसांनी उभारलेले अडथळेही तोडले.शंभू सीमेवर हरयाणाचे पोलीस व ट्रॅक्टर-ट्रॉलीजमध्ये आलेले पंजाबचे शेतकरी घग्गर नदीवरील पुलावर समोरासमोर आले. हरयाणाच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबच्या बाजुला एकत्र जमलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी तेथून निघून जायला ध्वनिक्षेपकाद्वारे सांगितले. हरयाणा पोलिसांनी या सीमेवरील अमृतसर-दिल्ली महामार्ग ट्रक्स उभ्या करून बंद केला. काही शेतकऱ्यांनी बॅरिकेडस नदीतही फेकले. सुरवातीला काही आंदोलक बॅरिकेडस पायीच ओलांडताना दिसले. नंतर पोलिसांनी बॅरिकेडस हटवले व आंदोलकांना व त्यांच्या ट्रॅक्टर्सना तेथून २०० किलोमीटरवर असलेल्या दिल्लीला जाणाऱ्या रस्त्यावर जाऊ दिले. परंतु, भाजपची सत्ता असलेल्या हरयाणातून महामार्ग जात असल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी बॅरिकडेस पोलिसांनी लावले होते.

करनालमध्ये पोलीस आणि शेतकरी समोरासमोर आले होते. हरयाणा आणि उत्तर प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा वाढवली होती. दुपारी आंदोलक शेतकऱ्यांनी सीमेवरील इतर ठिकाणांवरून हरयाणात प्रवेश केला ते दिल्लीकडे प्रवास करत होते. शंभूशिवाय पोलिसांनी खनौरी सीमा आणि कैथाल जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या आंदोलकांना अडवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला. मोदी सरकारच्या कुवर्तनाच्या विरोधात शेतकरी ठामपणे उभे राहिले आहेत, असे ट्वीट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध केला. गुडगावमध्ये स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव आणि आंदोलकांच्या गटाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

टॅग्स :delhiदिल्लीFarmerशेतकरीagitationआंदोलन