शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

राष्ट्रपती राजवट पुदुच्चेरीमध्ये लागू; पंतप्रधानांचा आज दौरा, काँग्रेसची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 12:43 AM

नारायणसामी यांचा राजीनामा राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविला होता.

नवी दिल्ली : बहुमत सिद्ध न करता आल्याने मुख्यमंत्री नारायणसामी यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिल्यानंतर पुदुच्चेरीमध्ये बुधवारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. या केंद्रशासित प्रदेशात दोन महिन्यांतच निवडणुका होणार आहेत.

नारायणसामी यांचा राजीनामा राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविला होता. तो राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने तिथे तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या चार व द्रमुकच्या एका आमदाराने राजीनामा दिल्याने नारायणसामी सरकार अल्पमतात आले होते. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी तामिळनाडूबरोबरच पुदुच्चेरीचाही दौरा करणार आहेत. तिथे ते काही योजनांचे भूमिपूजन व उद्घाटन करणार आहेत. त्यांच्या मार्गात व कार्यक्रमांच्या ठिकाणी निदर्शने करण्याचा निर्णय काँग्रेसने केला आहे.  भाजपने कटकारस्थान रचून आणि आमदार फोडून निवडणुकीच्या दोन महिने आधी लोकनियुक्त सरकार पाडले, असा काँग्रेसचा आरोप  आहे.

भाजपने तसे केले नाही

पुदुच्चेरीमध्ये अण्णा द्रमुकच्या मदतीने भाजप सरकार स्थापन करणार, अशी चर्चा सुरू होती. तिथे भाजपचा एकही आमदार नाही. मात्र तीन राज्यपाल नियुक्त आमदार हे भाजपच्या बाजूचे आहेत. त्यामुळे ते आणि अण्णा द्रमुक यांचे संयुक्त सरकार स्थापन होईल, असे बोलले जात होते. मात्र भाजपने तसे केले नाही आणि राष्ट्रपती राजवटच लागू झाली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा