शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा निर्णय हा काळ्या पैशावरील थेट हल्ला - नरेंद्र मोदी

By admin | Updated: December 29, 2016 20:50 IST

नोटाबंदीचा निर्णय हा काळ्या पैशावर केलेला थेट हल्ला आहे. या निर्णयामुळे काळा पैसा साठवणाऱ्यांना तो बाहेर काढावा लागला आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 29 -  नोटाबंदीचा निर्णय हा काळ्या पैशावर केलेला थेट हल्ला आहे. या निर्णयामुळे काळा पैसा साठवणाऱ्यांना तो बाहेर काढावा लागला आहे. या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेस मजबुती मिळणार असून, विविध क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगारांमध्ये वाढ होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 
नोटाबंदीच्या निर्णयानंतर प्रथमच प्रसारमाध्यमांशी थेट संवाद साधताना दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाची आवश्यकता आणि होणाऱ्या परिणामांबाबत सविस्तर माहिती दिली. मोदींनी इंडिया टुडे या नियतकालिकाला ही मुलाखत दिली आहे. इंडिया टुडेच्या पुढील अंकात ही मुलाखत प्रकाशित होणार आहे. 
 या मुलाखतीदरम्यान नोटाबंदीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना मोदी म्हणाले, "500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा भ्रष्टाचारावर केलेला थेट हल्ला आहे. या निर्णयामुळे काळा पैसा जमा करणाऱ्यांना तो बाहेर काढावा लागला आहे.  भ्रष्टाचारी आणि काळा पैसावाल्यांविरोधात केलेला थेट हल्ला आहे. भ्रष्टाचाऱ्यांविरोधात आम्ही 'तू डाल डाल, मै पात पात' असे धोरण स्वीकारले आहे."
काळा पैसा पांढरा करण्याचे प्रयत्न झाले तरी काळा पैसावाले वाचणार नसल्याचा दावा मोदींनी केला."नोटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले, पण अशा प्रत्येकाची माहिती आम्हाला मिळाली आहे. काळा पैसावाले आपली ओळख लपवू शकणार नाहीत. दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले तरी त्यांच्यासाठी वाचणे अशक्य आहे. काळा पैसा संपवणे हे आमचे लक्ष्य. बेहिशोबी मालमत्ताधारकांना अजून एक संधी देत आहोत."
मोदी पुढे म्हणाले, "काळा पैसा बँकींग व्यवस्थेत यावा अशी आमची इच्छा होती. नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणावर काळा पैसा मुख्य प्रवाहात आला आहे.  नोटाबंदीमुळे बॅंकात जमा झालेल्या पैशामुळे अर्थव्यवस्थेच मजबुती मिळणार आहे. त्यातून कृषी, उप्तादन आणि सेवा क्षेत्रात रोजगार वाढण्यास मदत होईल. " .यावेळी डि़जिटल व्यवहारांचे प्रमाण वाढणे आवश्यत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
उत्तर प्रदेशात काही महिन्यांनी होत असलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला नाही.  तसेच राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांच्या पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी आग्रही असल्याचेही मोदींनी मुलाखतीत सांगितले.