शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दहशतवादी संघटनांमधील काश्मिरींची भरती थांबली, मात्र पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 10:49 PM

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आल्यापासून तणावपूर्ण शांतता आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती आता निवळत  आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आल्यापासून तणावपूर्ण शांतता आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती आता निवळत  आहे. तसेच गेल्या काही दिवसांत दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक तरुण भरती झाल्याचे समोर आलेले नाही. असे जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले. काही ठिकाणी दहशतवाद्यांकडून फळविक्रेत्यांना धमकावण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र पोलिसांना परिस्थितीची माहिती असून, सर्वसामान्यांमध्ये कुणी दहशत पसरवू नये यासाठी आम्ही खबरदारी घेत आहोत.  दिलबाग सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक तरुण भरती झाल्याची कुठलीही नवी माहिती समोर आलेली नाही. भूतकाळात काही युवकांना भ्रमित करून त्यांना चुकीच्या मार्ग दाखवला गेला. मात्र त्यापैकी काही जणांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात परत आणण्यात आम्हाला यश मिळाले आहे. काही ठिकाणी घुसखोरी झाल्याचे वृत्त आहे. गेल्या महिन्यात गुलमर्ग विभागात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले होते.'' दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीबाबत दिलबाग सिंह यांनी सांगितले की,''काश्मीर खोऱ्यात आता परिस्थिती हळुहळू पूर्वपदावर येत आहे. विद्यार्थी शाळेत जात आहेत. तसेच कर्मचारी कार्यालयांमध्ये जात आहेत. मात्र दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी फळविक्रेत्यांना धमकावल्याच्या घटना घडल्या आहेत.''  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद