शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

लिपुलेखमार्गे कैलास यात्रेवर नेपाळचा आक्षेप; काठमांडूशी सल्लामसलत केली नसल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 10:03 IST

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, यात्रेचा मार्ग निश्चित करण्यापूर्वी काठमांडूशी सल्लामसलत केली नाही. भारताने सातत्याने म्हटले आहे की, लिपुलेख हा भारताचा भाग आहे.

काठमांडू : लिपुलेख खिंडीमार्गे कैलास मानसरोवर यात्रा आयोजित करण्याच्या भारत आणि चीनच्या योजनेला नेपाळने रविवारी आक्षेप घेतला असून, तो आपला प्रदेश असल्याचा दावा केला आहे.

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, यात्रेचा मार्ग निश्चित करण्यापूर्वी काठमांडूशी सल्लामसलत केली नाही. भारताने सातत्याने म्हटले आहे की, लिपुलेख हा भारताचा भाग आहे. भारताने जून ते ऑगस्टदरम्यान कैलास मानसरोवर यात्रा आयोजित करण्याची घोषणा केली, तेव्हा नेपाळने यात्रेला आक्षेप घेतला होता.

सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, १८१६ च्या सुगौली करारानुसार, महाकाली नदीच्या पूर्वेला असलेले लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी, हे नेपाळ सरकारचे अविभाज्य प्रदेश आहेत, या आपल्या भूमिकेवर नेपाळ सरकार ठाम आहे.

निवेदनानुसार, नेपाळ सरकारने यापूर्वी भारत सरकारला या भागात रस्ते बांधकाम, विस्तार, सीमा व्यापार आणि तीर्थयात्रा यांसारखे उपक्रम न राबवण्याची विनंती केली होती. नेपाळ आणि भारत यांच्यातील घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेता, नेपाळ सरकार ऐतिहासिक करार, तथ्ये, नकाशे आणि पुराव्यांच्या आधारे राजनैतिक मार्गाने सीमा प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे.(वृत्तसंस्था)

भारताने फेटाळला दावा

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून अनेक दशकांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेला नेपाळने घेतलेला आक्षेप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी स्पष्टपणे फेटाळला. प्रादेशिक दाव्यांचा असा एकतर्फी कृत्रिम विस्तार अस्वीकार्य आहे, असे मंत्रालयाने म्हटले.

नेपाळच्या आक्षेपावर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ३० एप्रिल रोजी जाहीर केले की, वार्षिक कैलास मानसरोवर यात्रा यावर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत उत्तराखंडमधील लिपुलेख खिंड आणि सिक्कीममधील नाथू ला खिंड या दोन मार्गांनी आयोजित केली जाईल.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, यासंदर्भात भारताची भूमिका नेहमीच सुसंगत आणि स्पष्ट राहिली आहे. १९५४ पासून लिपुलेख खिंड हा कैलास मानसरोवर यात्रेसाठी एक प्रमुख मार्ग राहिला आहे आणि या मार्गाने प्रवास अनेक दशकांपासून सुरू  आहे. ही काही नवीन घडामोड नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nepal objects to Kailash Yatra via Lipulekh, claims no consultation.

Web Summary : Nepal objects to India-China's Kailash Mansarovar Yatra plan via Lipulekh, claiming territory and lack of consultation. India rejects Nepal's claim, asserting Lipulekh's historical use for the pilgrimage since 1954.