शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

11 वर्षात फक्त मोठ-मोठी आश्वासने, पण प्रत्यक्षात...मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 13:27 IST

Modi Govt 11 Years: आज केंद्रातील मोदी सरकारला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत.

Modi Govt 11 Years: आज, 26 मे 2024 रोजी केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत मोठमोठी आश्वासने पोकळ दावे निघाल्याची बोचरी टीका केली. यासोबतच, खरगेंनी मोदी सरकारवर 140 कोटी जनतेतील प्रत्येक वर्गाला त्रास दिल्याचा आरोपही केला आहे. 

खरगे यांनी 7 मुद्दे मांडले

मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले की, '26 मे 2014. गेल्या 11 वर्षांत मोठमोठी आश्वासनने फक्त पोकळ दावे निघाल्याने देश उद्ध्वस्त झाला. 'अच्छे दिन'ची चर्चा आता 'भयानक स्वप्न' वाटते. 140 कोटी लोकांचा प्रत्येक वर्ग त्रस्त आहे. 11 वर्षांत कमळाचे चिन्ह हे असे करत आहे!

तरुण - दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन, प्रत्यक्षात कोट्यवधी नोकऱ्या गायब झाल्या.

शेतकरी - उत्पन्न दुप्पट झालेले नाही, उलट त्यांना रबर बुलेट सहन करावे लागले.

महिला - आरक्षणावर अटी लागू आहेत, सुरक्षा धोक्यात आहे. 

दुर्बल घटक - अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी/अल्पसंख्याक भयंकर अत्याचारांना तोंड देत आहेत. 

अर्थव्यवस्था - महागाई शिगेला, बेरोजगारी वाढत आहे, वापर थांबला आहे, मेक इन इंडिया अपयशी ठरला आहे आणि असमानता शिगेला पोहोचली आहे. 

परराष्ट्र धोरण- 'विश्वगुरू' होण्याचे आश्वासन दिले होते, परंतु प्रत्येक देशाशी संबंध बिघडवले. 

लोकशाही - प्रत्येक स्तंभावर आरएसएसचा हल्ला, ईडी/सीबीआयचा गैरवापर, संस्थांची स्वायत्तता नष्ट. 

मोदी सरकारला 11 वर्षे पूर्णनरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सत्तेत येऊन 11 वर्षे पूर्ण केली आहेत. या 11 वर्षांत मोदी सरकारने अनेक मोठे आर्थिक, सामाजिक आणि परराष्ट्र धोरणात बदल केले आहेत, ज्यांचा भारताच्या दिशेवर लक्षणीय परिणाम झाला आहे.

आर्थिक आघाडीवर, 'मेक इन इंडिया', 'आत्मनिर्भर भारत' आणि जीएसटी सारख्या सुधारणा लागू करण्यात आल्या, ज्याचा उद्देश अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि गुंतवणूक आकर्षित करणे हा होता. सामाजिक क्षेत्रात, 'स्वच्छ भारत अभियान', 'जन धन योजना' आणि 'आयुष्मान भारत' सारख्या योजनांनी व्यापक लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवणे आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) सारखे निर्णयही याच काळात घेण्यात आले. परराष्ट्र धोरणात, सरकारने भारताचे जागतिक स्थान मजबूत करणे, विविध देशांशी संबंध दृढ करणे आणि बहुपक्षीय व्यासपीठांवर सक्रिय भूमिका बजावणे यावर लक्ष केंद्रित केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपाcongressकाँग्रेस