शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर मोदी सरकारने घातल्या धाडी -राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 4:57 AM

अनुराग कश्यप, तापसी पन्नूवरील कारवाईचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या लोकांवर मोदी सरकार धाडी टाकत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. फँटम फिल्म्स या चित्रपट निर्मिती संस्थेने केलेल्या कथित करचोरीप्रकरणी प्राप्तिकर खात्याने अनुराग कश्यप, तापसी पन्नू आदींच्या मुंबई, पुण्यातील घरे व कार्यालयांवर ३० ठिकाणी बुधवारी धाडी घातल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी म्हणाले की, मोदी प्राप्तिकर खात्याला आपल्या इशाऱ्यांवर नाचवत आहेत. प्रसारमाध्यमांवरही मोदी सरकारचा मोठा दबाव आहे. नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर केंद्र सरकार धाडी घालत आहे. 

भाजपनेही हिंदी म्हणींद्वारे दिले प्रत्युत्तरn    राहुल गांधी यांनी सांगितले की, मोदी सरकार ज्या पद्धतीने वागत आहे, त्यावरून ‘उंगलियों पे नचा’, ‘भीगी बिल्ली बनना’, ‘खिसियानी बिल्ली खंभा नोचे’  अशा हिंदीतल्या म्हणी व वाक्प्रचार आठवतात. n    त्यावर दिलेल्या प्रत्युत्तरात भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे की, आता विचारस्वातंत्र्याची कड घेणाऱ्या काँग्रेसने आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी केली होती. त्यामुळे या पक्षाचा पवित्रा ‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को’ असा आहे.n    सध्या काँग्रेसची इतकी दुर्दशा झाली आहे की, तिची अवस्था ‘उंगलियोंपर गिने जा सकना’ अशी आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी