शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

...अन् सुषमा स्वराज यांची 'ती' अंतिम इच्छा झाली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 08:36 IST

'त्या म्हणाल्या की उद्या सहा वाजता या'

नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांची अंतिम इच्छा त्यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी पूर्ण केली आहे. सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी जेष्ठ वकील हरीश साळवे यांना कुलभूषण जाधव खटल्याची फी देण्यासाठी बोलविले होते.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव खटल्याच्या सुनावणीदरम्यान हरीश साळवे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यासाठी त्यांनी फक्त एक रुपयाचे मानधन घेण्याचे ठरविले होते. कुलभूषण जाधव खटल्याची सुनावणी झाल्यानंतर हरीश साळवे यांना त्यांची फी घेऊन जाण्यासाठी बोलविले होते. मात्र, यानंतर सुषमा स्वराज यांचे निधन झाले. सुषमा स्वराज यांनी ही अंतिम इच्छा त्यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी पूर्ण केली आहे. 

बांसुरी स्वराज यांनी शुक्रवारी हरीश साळवे यांची भेट घेऊन त्यांची फी दिली आहे. सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "बांसुरीने आज तुझी अंतिम इच्छा पूर्ण केली आहे. कुलभूषण जाधव खटल्याची एक रुपया फी, जी तू सोडून गेली होती, ती तिने हरीश साळवे यांची भेट घेऊन दिली आहे."

दरम्यान, माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्टला निधन झाले. निधनाच्या आधी हरीश साळवे यांना त्यांची फी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना हरीश साळवे यांनी सांगितले होते की, "निधनाच्या जवळपास एक तास आधी मी सुषमा स्वराज यांच्याशी बोललो होतो. रात्री 8.50 वाजता आमची बातचीत झाली. तो अतिशय भावनिक संवाद होता. त्या म्हणाल्या की, या आणि मला भेटा. जो खटला तुम्ही जिंकला, त्यासाठी तुम्हाला तुमचा एक रुपया द्यायचा आहे. मी म्हणालो, नक्कीच, मला ती मौल्यवान फी घेण्यासाठी यायचंच आहे. मग त्या म्हणाल्या की उद्या सहा वाजता या."

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजKulbhushan Jadhavकुलभूषण जाधव