शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Maharashtra Government: 'मुख्यमंत्रिपदावरुन आमच्यात भांडण होणार नाही; शिवसेनेचा सन्मान राखला जाईल'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 3:51 PM

राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट सुरु आहे. जर राष्ट्रपती राजवट हटवायची असेल तर तिन्ही पक्षांना एकत्र आल्याशिवाय ते शक्य होणार नाही

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर दिल्लीत नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरु आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते दिल्लीत डेरेदाखल आहेत तर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातही बैठक झाली आहे. यानंतर उद्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर अंतिम हात फिरवला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

याबाबत नवाब मलिक म्हणाले की, राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट सुरु आहे. जर राष्ट्रपती राजवट हटवायची असेल तर तिन्ही पक्षांना एकत्र आल्याशिवाय ते शक्य होणार नाही. राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्यावर आमचं एकमत आहे. त्यासाठी उद्या काँग्रेसच्या नेत्यांसोबत आमची चर्चा होणार आहे. तसेच शिवसेनेचा सन्मान ठेवणे ही आमची जबाबदारी आहे असा पुनरुच्चारही त्यांनी केला. त्याचसोबत  मुख्यमंत्रिपदावरून आमच्यात भांडणं होणार नाहीत असंही मलिकांनी सांगितले. 

तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येतील म्हणून माध्यमांनी त्यांना महाशिवआघाडी असं नावं दिलं आहे. पण हे बरोबर नाही. कारण आतापर्यंत देशात जिथे कुठे आघाडी झाली तिथे कुठल्या एका पक्षाचं नाव कधी त्यात आलं नाही. पुलोद, संयुक्त पुरोगामी आघाडी ,लोकशाही आघाडी अशी नावं दिली असल्याचं सांगत महाशिवआघाडी या नावावर नवाब मलिकांनी आक्षेप घेतला.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पवारांच्या विधानानंतर सावध पवित्रा घेतला आहे. थोरात म्हणाले की, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक सुरु आहेत, ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील तो राज्याच्या हिताचा असेल. काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा झाल्यानंतर पुढील टप्पा सुरु होईल. भाजपाला दूर ठेवलं पाहिजे पण कशापद्धतीने यावर चर्चा सुरु आहे. मित्रपक्षांशी बोलण्यास वेळ जाणार आहे. निर्णय दिल्लीत होईल. जो निर्णय होईल तो मान्य राहणार आहे असं थोरातांनी स्पष्ट केलं आहे.  

मात्र सोमवारी झालेल्या शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आम्हाला राज्यपालांनी सहा महिन्याचा अवधी दिलेला आहे. आम्ही राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. शिवसेनेनं १७० आमदारांचा आकडा कुठून आणला याची कल्पना नाही, हा प्रश्न शिवसेना नेत्यांना विचारा असं सांगितल्याने सगळ्यांच्या भूवया उंचावल्या होत्या.  

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्रीcongressकाँग्रेस