शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: 'मुख्यमंत्रिपदावरुन आमच्यात भांडण होणार नाही; शिवसेनेचा सन्मान राखला जाईल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 15:52 IST

राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट सुरु आहे. जर राष्ट्रपती राजवट हटवायची असेल तर तिन्ही पक्षांना एकत्र आल्याशिवाय ते शक्य होणार नाही

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर दिल्लीत नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरु आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते दिल्लीत डेरेदाखल आहेत तर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातही बैठक झाली आहे. यानंतर उद्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर अंतिम हात फिरवला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

याबाबत नवाब मलिक म्हणाले की, राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट सुरु आहे. जर राष्ट्रपती राजवट हटवायची असेल तर तिन्ही पक्षांना एकत्र आल्याशिवाय ते शक्य होणार नाही. राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्यावर आमचं एकमत आहे. त्यासाठी उद्या काँग्रेसच्या नेत्यांसोबत आमची चर्चा होणार आहे. तसेच शिवसेनेचा सन्मान ठेवणे ही आमची जबाबदारी आहे असा पुनरुच्चारही त्यांनी केला. त्याचसोबत  मुख्यमंत्रिपदावरून आमच्यात भांडणं होणार नाहीत असंही मलिकांनी सांगितले. 

तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येतील म्हणून माध्यमांनी त्यांना महाशिवआघाडी असं नावं दिलं आहे. पण हे बरोबर नाही. कारण आतापर्यंत देशात जिथे कुठे आघाडी झाली तिथे कुठल्या एका पक्षाचं नाव कधी त्यात आलं नाही. पुलोद, संयुक्त पुरोगामी आघाडी ,लोकशाही आघाडी अशी नावं दिली असल्याचं सांगत महाशिवआघाडी या नावावर नवाब मलिकांनी आक्षेप घेतला.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पवारांच्या विधानानंतर सावध पवित्रा घेतला आहे. थोरात म्हणाले की, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक सुरु आहेत, ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील तो राज्याच्या हिताचा असेल. काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा झाल्यानंतर पुढील टप्पा सुरु होईल. भाजपाला दूर ठेवलं पाहिजे पण कशापद्धतीने यावर चर्चा सुरु आहे. मित्रपक्षांशी बोलण्यास वेळ जाणार आहे. निर्णय दिल्लीत होईल. जो निर्णय होईल तो मान्य राहणार आहे असं थोरातांनी स्पष्ट केलं आहे.  

मात्र सोमवारी झालेल्या शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आम्हाला राज्यपालांनी सहा महिन्याचा अवधी दिलेला आहे. आम्ही राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. शिवसेनेनं १७० आमदारांचा आकडा कुठून आणला याची कल्पना नाही, हा प्रश्न शिवसेना नेत्यांना विचारा असं सांगितल्याने सगळ्यांच्या भूवया उंचावल्या होत्या.  

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्रीcongressकाँग्रेस