शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: केरळमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, ९६ जागांवर घेतली आघाडी
2
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
3
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
4
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
5
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
6
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
7
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
8
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
9
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
10
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
11
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
12
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
13
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
14
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
15
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
16
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
17
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
18
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
19
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
20
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 14:16 IST

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: देशभरात इंडिया आघाडीची त्सुनामी असून, वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा पराभव होईल, असा दावा मोदींविरोधात निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे उमेदवार अजय राय (Ajay Rai) यांनी केला आहे.

एक जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्येही मतदान होणार आहे. नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा वाराणसीमधून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेसचे नेते अजय राय यांनी मोदींसमोर आव्हान उभे केले आहे. यावेळी वाराणसीमध्ये इंडिया आघाडीने अजय राय यांच्यामागे आपली सर्व ताकद एकवटली आहे. त्यामुळे मोदींना या निवडणुकीत कडवं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशभरात इंडिया आघाडीची त्सुनामी असून, वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांचा पराभव होईल, असा दावा मोदींविरोधात निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी केला आहे.

एका मुलाखतीमध्ये वाराणसीमधील निवडणुकीबाबत अजय राय म्हणाले की, निवडणुकीच्या स्थितीबाबत इतरांपेक्षा मी अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतो. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यासोबत विरोधी पक्ष अधिकाधिक भक्कम होत चालला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाने भाजपाल एक कठोर संदेश दिला आहे.  अटलबिहारी वाजपेयी यांच्या पक्षाच्या कॅडर प्रणालीचा सन्मान केला जात असे. मात्र आता असं होत नाही, असे अजय राय म्हणाले. 

मागच्या दोन निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींकडून दारुण पराभव झालेल्या अजय राय यांनी आता लोक समजूतदार झाले असून, यावेळी नक्की बदल घडवतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. जनता भाजपाची आश्वासनं ऐकून थकली आहे. तसेच बदल घडवण्याची संधी शोधत आहे. मागच्या वेळी नरेंद्र मोदी हे वाराणसीमध्ये एक रात्रही थांबले नव्हते. मात्र यावेळी ते १३ आणि २१ मे रोजी दोन रात्री येथे थांबले होते, असेही अजय राय यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची त्सुनामी सुरू असून, त्यात भाजपा कुठे जाईल ते कळणारही नाही. वाराणसीमध्ये विकास दिसत नाही आहे. सर्वसामान्य लोक त्रस्त आहेत. मोदी गंगामातेचे पुत्र बनून आले होते. मात्र अजूनही गंगा प्रदूषित होत आहे.  शहरातील नाल्यांचं पाणी गंगेत सोडलं जात आहे. काशीला प्रयोगशाळा बनवून ठेवलं आहे. रोज नवनव्या प्रयोगांमुळे लोक त्रस्त आहेत. तसेच यावेळी वाराणसीमध्ये गुजराती भगाओ अभियान सुरू आहे. तसेच आता जनता मोदींना निरोप देईल, असा दावा अजय राय यांनी केला.

पूर्वी भाजपामध्ये असलेले अजय राय हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र २००९ मध्ये ते समाजवादी पक्षात गेले होते. पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, २००९, २०१४ आणि २०१९ अशा तीन लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसvaranasi-pcवाराणसीUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४